शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

गोंदिया येथे सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असा सूर या रॅलीतून उमटला.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली : हजारो नागरिकांचा सहभाग, सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभर आंदोलन केले जात आहे. बुधवारी (दि.२५) गोंदिया येथे सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असा सूर या रॅलीतून उमटला.लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सीएए आणि एनआरसी हा कायदा पारित झाला. त्यानंतर या कायदाबाबत नागरिकांमध्ये चुकीचा भ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी या विरोधात आंदोलन केले जात आहे.मात्र हा कायदा राष्ट्रहित जोपसणारा असून यात कुठलेही गैर नाही, त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ गोंदिया येथे बुधवारी सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे रॅली काढण्यात आली.सकाळी ९ वाजता सिव्हील लाईन येथील हनुमान मंदिर परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर ही रॅली नेहरू चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदनी चौक, नगर परिषद मार्गे गांधी चौक, जयस्तंभ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचली. भारत मातेची प्रतिमा, भव्य राष्ट्रध्वज, भगवे झेंडे आणि देशभक्तीच्या नाऱ्यानी संपूर्ण शहर दुमदुमले.या रॅली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक संतोष सपाटे यांच्या नेतृत्त्वात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर या रॅलीचे सभेत रुपांतर झाले. जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सभा घेण्यात आली.या वेळी सिंधू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानदास सदवानी यांनी पाकिस्तान, बांग्लादेश व अफगानिस्तान येथे हिंदू धर्मियांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले जात आहे. भारतात अल्पसंख्याक समाजाला स्वतंत्रता आहे. मात्र या तीन देशात वेगळेच चित्र आहे. भारत हा धर्मशाळा नाही. घुसखोरांना देशात जागा दिली जाणार नाही. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, राष्ट्रच्या नावावर विद्रोहाची भाषा करणाºयांची गय केली जाणार नाही. ही रॅली देशाच्या सन्मानार्थ असून दगडफेक करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.अ‍ॅड. संदीप जैन म्हणाले, भारताच्या फाळणी दरम्यान पाकिस्तानमध्ये २३ टक्के गैर मुस्लिम होते. ती ३ टक्क्यांवर आली आहे. तर बांग्लादेशात ३० टक्केवरुन ८ टक्के आणि अफगानिस्तानमध्ये २२ टक्केवरुन ३ टक्के वर आली आहे. त्यामुळे यात नेमकी घट कशामुळे झाले हे नागरिक गेले कुठे की त्यांचे धर्मातंरण करण्यात आले. नागरिकता संशोधन विधेकयकात काहीच गैर नसून देशवासीयांना घाबरण्याची गरज नाही. केवळ घुसखोरांना पळवून लावण्याची गरज असल्याचे सांगितले. दलजिसिंह खालसा म्हणाले, देशाची फाळणी होण्याची वेळ पुन्हा येऊ नये. देशाच्या फाळणीचे परिणाम आणि यातना यापूर्वीच भोगल्या आहेत. नागरिकता संशोधन कायद्याचा विरोध कशासाठी हे समजण्यापलिकडे आहे. त्यामुळेच समर्थनार्थ निघणाऱ्या रॅलीवर फुलांचा वर्षाव होत आहे तर विरोधात निघणाऱ्या रॅलीवर दगडफेक होत असल्याचे सांगितले. कवि रमेश शर्मा म्हणाले आपल्या देशात किती तरी घुसखोर आले असून त्यांना बाहेर काढण्याची गरज असल्याचे सांगितले.रॅलीत खा. सुनील मेंढे, आ.विनोद अग्रवाल, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, डॉ. प्रशांत कटरे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, रचना गहाणे, नगरसेवक भरत क्षत्रिय, दिनेश दादरीवाल, अनिल हुंदानी, राजू वालिया, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले, सुनील तिवारी, अमित शुक्ला, भरत शुक्ला, भावना कदम, डॉ. सुवर्णा हुबेकर, मौसमी सोनछात्रा, हेमलता पतेह, दिलीप गोपलानी, जितेंद्र पंचबुद्धे, अफसाना पठान, दीपक बोबडे, नेहा नायक, राजू कुथे, धर्मेश अग्रवाल, लोकेश यादव, डॉ. विकास जैन, संजय जैन, हर्षल पवार, अ‍ॅड. ओमप्रकाश मेठी, अंकित कुलकर्णी, मुन्ना यादव, कुशल अग्रवाल, छैलबिहारी अग्रवाल, अभय अग्रवाल, दीपक कदम, अरुण अजमेरा, दिव्या भगत, धर्मिष्ठा सेंगर, तपस्या सेंगर, दुर्गेश रहांगडाले, अ‍ॅड. रंजिता शुक्ला, गुड्डू चांदवानी, ऋषिकांत साहू, श्रीनिवास मुंदडा, जयंत शुक्ला, शशि इसरका, सतीश राठी, राम कुंदनानी, मनोहर वालेचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बालकृष्ण बिसेन, वसंत ठाकुर, राजू नोतानी, सचिन चौरसिया, संदीप श्रीवास, दिलीप गुप्ता, योगेश पशीने,मोंटू पुरोहित, दिव्यांग धर्मराज काले, विक्की यादव, अमित यादव, अजय यादव, सनत मुरकुटे, अर्चना अग्रवाल, महेंद्र मिश्रा, अजय ब्राह्मणकर, अर्चना शर्मा, कविता शर्मा, शीतल रहांगडाले, विश्व हिन्दूसभाचे हरीश अग्रवाल, शोभा भारद्वाज, वंदना पाठक, ऋषभ यादव, प्रकाश सलूजा,नरेश लालवानी, दिलीप कुंदवानी, अनिल भगतानी, गुड्डू उके यांचा सहभाग होता. संचालन सुषमा यदूवंशी यांनी केले तर आभार माधव गारसे यांनी मानले.देशाच्या विकासासाठी सीएए आवश्यकरॅली आणि सभेच्या समारोपानंतर सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ राष्टÑपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले. या निवेदनातून देशाच्या विकासासाठी सीएए आणि एनआरसी हे दोन्ही कायदे आवश्यक आहे. मात्र काहीजण या विरोधात नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करुन देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करीत आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चा