शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दुकानदारांचे सामान व बोर्ड परत येऊ लागले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांनी त्याचा गैरफायदा घेत सामान व बोर्ड रस्त्यावर ठेवणे सुरू केले आहे. अशात आता मोहीम राबविल्यास मात्र काहीही न सांगता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाजारात दुकानदारांकडून दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर मांडले जात असल्याने नागरिकांना वाहन ठेवण्यास अडचण होते. येथूनच वाहतुकीची डोकेदुखी सुरू होत असल्याने नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली होती. मात्र या मोहिमेला खंड पडताच दुकानदारांकडून पुन्हा दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. बाजारातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत त्यात दुकानदार आपल्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. यामुळे नागरिकांना वाहन ठेवताना अडचण होते. परिणामी नागरिक खरेदीसाठी आले तर, रस्त्यावरच वाहन ठेऊन मोकळे होतात. येथूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते व जागोजागी ट्राफिक जामची समस्या उद्भवते. यामुळे नागिरकांना विनाकारण डोकेदुखी व त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वत: बघितला व अनुभवला आहे. यामुळेच त्यांनी नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेला संयुक्तरित्या मोहीम छेडून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.   यावर ८ मार्च रोजी नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली व रस्त्यावर असलेले दुकानदारांचे सामान व बोर्ड हटवून घेतले होते. त्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वत: उपस्थित राहून मोहीम छेडली होती. खास बात म्हणजे,नगरपरिषदेचे पथक किंवा वाहतूक पोलीस दिसल्यास दुकानदार तेवढ्यापुरते सामान व बोर्ड उचलून आत नेतात. मात्र त्यानंतर चित्र होते तेच दिसून येते. आता मोहिमेला सुमारे आठवड्याभराचा खंड पडला आहे. परिणामी दुकानदारांचे सामान व बोर्ड पुन्हा रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. 

आता थेट जप्तीची कारवाई - नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांनी त्याचा गैरफायदा घेत सामान व बोर्ड रस्त्यावर ठेवणे सुरू केले आहे. अशात आता मोहीम राबविल्यास मात्र काहीही न सांगता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

आतापर्यंत २ वेळा मोहीम राबविली असून दुकानदारांना समजावून सांगितले आहे. मात्र त्यानंतरही परिस्थिती तीच दिसून येत आहे. अशात आता मोहीम राबविल्यास काहीही न सांगता सामानाची जप्ती करून न्यायालयात केस पाठविली जाईल. त्यामुळे दुकानदारांनी सामान रस्त्यावर न ठेवता सहकार्य करावे. - दिनेश तायडे निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण