शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

तीव्र पाणीटंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:15 IST

मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली.

ठळक मुद्देचामोर्शी तालुका : जलपातळी घटल्याने नळ योजनांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली. याचा परिणाम आता दिसून येत आहे. तालुक्यातील नदी काठालगतच्या अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण व्हायची. परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच लहान नाले, तलाव आटायला सुरूवात झाली. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीतील जलपातळी झपाट्याने घटत आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील पाच ते सहा गावांना पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच बसत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चामोर्शी जवळील चिचडोह बॅरेज बांधून पाणी अडविण्यात आल्यामुळे बॅरेजच्या उतार भागात असलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनांना मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी शक्यता दिसून येत नाही. आतापासूनच या नळ योजनांची जलपातही अतिशय खाली गेली आहे. भेंडाळा, वाघोलीसह परिसरातील तीन ते चार गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया नळ योजनांच्या विहिरीतील जलपातळी खाली गेल्याने गावात केल्या जाणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुन्हा उन्हाळ्याची दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे अशा स्थितीत या भागात पाणीटंचाई तीव्र होईल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. बॅरेजच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाणी शिल्लक नाही. परिणामी या भागातील नळ योजनांद्वारे एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करावा लागत आहे.विशेष म्हणजे गावातील अनेक विहिरी व हातपंपाची पातळी अत्यंत खाली गेली आहे. यातील पाणीपातळी पुन्हा खाली गेल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. या भागातील भाजीपाला तसेच उन्हाळी धानपिकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे नव्यानेच निर्माण झालेल्या चिचडोह बॅरेजमधील पाणी कडक उन्हाळ्यात नदीच्या उतार भागात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई