शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

गंभीर रूग्ण झोपतात जमिनीवर

By admin | Updated: February 23, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील रूग्णांची तोबा गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढली. या वाढत्या रूग्णांमुळे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे सांगून ...

लोकमत विशेषगोंदिया : जिल्ह्यातील रूग्णांची तोबा गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढली. या वाढत्या रूग्णांमुळे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे सांगून उपचार करून वेळीच घरी जा असे सांगितले जाते. तर काहींना खालीच झोपावे लागत आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र या रूग्णालयात २०० खाटांची सोय नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोकांना उपचार केल्यानंतर लगेच उपचार करून घरी पाठविण्यात येते. काहींना खाटा दिल्या जात नसल्यामुळे त्यांना खालीच जागा मिळेल तिथे झोपावे लागते. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शनिवारी हा प्रकार प्रकर्षाने जाणवला. कुडवा येथील सौरभ अनिल वडीचार (१५) याला आपल्या पायाचे प्लास्टर काढून दुसरे प्लास्टर लावायचे होते. त्यासाठी तो रूग्णालयात आला होता. मात्र त्याला खाट न दिल्यामुळे त्याला त्याच्या आईवडीलांनी आपल्या खुर्चीवरच झोपवून आपल्या मांडीचा आधार दिला. कुडवा येथील संतोष दलीराम गजभिये (४९) यांनाही झोपायला खाट नसल्यामुळे ते तासनतास स्ट्रेचरवरच पडून होते. गराडा येथील वामन दयाराम बावनकर (४०) यांच्या पायाचे प्लास्टर करण्यात आले. परंतु त्यांनाही खाट उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तासनतास रूग्णालयातील खुर्चीवर बसून राहावे लागले. गराडा येथील बाळकृष्ण बाबूराव बावनकर (४५) हे अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात १५ दिवस तरी दाखल करणे गरजेचे असतांना त्यांच्या पायाला प्लास्टर करून त्यांना डॉक्टरांनी घरी जाण्यास सांगितले. प्लास्टर झाले परंतु पायाची हालचाल करता येत नसतानाही त्या रूग्णांना तिथून घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. रूग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून त्यांना तेथून घरी जाण्याचा सल्ला दिला जातो. यावर त्या रूग्णांनीे चक्क रूग्णालयाच्या प्रवेश दारावर असलेल्या वऱ्हांड्यालाच आपले आराम करण्याचे स्थान बनविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांनाही केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात खाटा दिल्या जात नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असल्याची रूग्णांची तक्रार वाढतच चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)अनेक रूग्ण रेफर टू नागपूरएकमेव शासकीय जिल्हा सामान्य रूग्णालय असल्यामुळे गरिब रूग्ण या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतात. परंतु अनेक रूग्णांना गंभीर असल्याचे सांगून नागपूरला रेफर केले जाते. अपघातातील जखमी असोत किंवा जळालेले रूग्ण असोत त्यांना रेफर टू नागपूर केले जाते.रूग्णांची पिळवणूकगरिब रूग्ण उपचार घेण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात आल्यास त्यांना त्यांचा आजार गंभीर असल्याचे सांगून खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठविले जाते. काही डॉक्टर स्वत:च्या खासगी रूग्णालयात, तर काही दुसऱ्या खासगी डॉक्टरांकडे अनेक रूग्णांना रेफर करतात. काही डॉक्टरांचे खासगी रूग्णालयाशी साटेलोटे असल्यामुळे त्यांना कमीशन देण्यात येत असल्याचे बोलले जाते. गरिब रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.