शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सात तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:03 IST

जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली.

ठळक मुद्दे३ हजार ७८५ घरांची पडझड : २२ हजार हेक्टरवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली. तर ग्रामीण भागातील रस्ते, पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय विद्युत खांबही कोसळले आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची कामेही त्वरेने हाती घ्यावी लागणार आहेत.केवळ तीन दिवसात जिल्ह्यात ९९.७३ मिलीमीटर पाऊस पडला. पावसाचे हे प्रमाण मासिक सरासरीच्या दीडशे टक्के इतके अधिक आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात सर्वाधिक हानी झाली असून येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नुकसानीचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. पाहणीसाठी प्रत्येक तालुक्यात महसूल, कृषी आणि पंचायत विभागाची चमू तयार करण्यात आली. त्या माध्यमातून संयुक्त पंचनामे सुरू आहेत.तालुक्यात नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतशिवारातील पीक पाण्याखाली आले. नदीकाठचे पीक वाहून गेले. केळापूर तालुक्यात ३५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुसद तालुक्यात ७९४ हेक्टर, घाटंजी तालुक्यात दोन हजार हेक्टरचे नुकसान झाले. दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरचे नुकसान झाले. महागाव तालुक्यात नऊ हजार ५६२ हेक्टरचे नुकसान झाले. उमरखेडमध्ये सात हजार ८११ हेक्टरचे नुकसान झाले. तर झरीमध्ये दोन हजार हेक्टरवर नुकसानीची नोंद करण्यात आली.सततच्या पावसाने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामध्ये ३ हजार ७८५ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. ग्रामीण भागातील सर्वेक्षण अद्यापही सुरू आहे. यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेडमध्ये १००, महागाव २५१, दिग्रस ६००, केळापूर २७, पुसद ८४, यवतमाळ ३१, घाटंजी २६, कळंब ४, आर्णी १२७६, दारव्हा तालुक्यात १३८६ घरांची पडझड झाली. उमरखेडमध्ये ४०० घरांना पुराचा धोका निर्माण झाल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शासकीय इमारती आणि रस्त्यांना पावसाचा मोठा फटका बसला. आता सार्वजनिक बांधकाम विभागापुढे दुरुस्तीचे आव्हान आहे. पावसादरम्यान विद्युत खांब आडवे पडले.जिल्ह्यातील जलसाठ्यात समाधानकारक वाढचार प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’मोठा पूस, नवरगाव, सायखेडा आणि बोरगाव हे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. अरूणावती प्रकल्पात २४ तासात ३२ टक्क्यावरून ७५ टक्के जलसाठा निर्माण झाला. बेंबळामध्ये ४९, अडाण ८९, गोकी ५९, वाघाडी ६१, तर अधरपूस प्रकल्पात ८० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम व ९२ लघु अशा १०१ प्रकल्पांमध्ये ६६.४२ टक्के जलसाठा साचला आहे.सरासरीच्या ६७ टक्के पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. आर्णी तालुक्यात ९४ टक्के पाऊस झाला आहे. कळंब आणि राळेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.२० लाखांची तात्काळ मदतछावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या कुटुंबीयांना २० लाख रूपयांची मदत तात्काळ वितरित करण्यात आली. आरोग्य विभागाच्या यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर