शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

शाळेच्या नियोजनाला पालकांचे सहकार्य व संमतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

अर्जुनी-मोरगाव : कोविड-१९ मुळे किमान १० महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे. यामुळे २७ जानेवारीपासून ५वी ...

अर्जुनी-मोरगाव : कोविड-१९ मुळे किमान १० महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे. यामुळे २७ जानेवारीपासून ५वी ते ७वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे शाळेच्या नियोजनाला पालकांचे सहकार्य आणि संमतीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य वीणा नानोटी यांनी केले.

सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंटमध्ये शनिवारी (दि. २३) घेण्यात आलेल्या पालक सभेत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शाळेच्या वेळेचे नियोजन, तासिका अभ्यासक्रम, परीक्षा, गणवेश इत्यादी विषयांवर पालकांसमक्ष चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर पालकांनी सकारात्मकता दर्शविली. शाळेत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासले जाईल. शाळा परिसर - बेंचेस सॅनेटाईझ केले जातील. एका बेंचवर दोनच विद्यार्थी बसतील, या विषयांवर चर्चा करण्यात आली. पालक सभेला ५२ पालक उपस्थित होते. सभेला पर्यवेक्षक मुकेश शेंडे, ईपीटीए उपाध्यक्ष अरुणा चितलांगे, सहसचिव मंजिरी भाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक मुकेश शेंडे यांनी मांडले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. सभेसाठी ईश्वर बोरकर, अविनाश मेश्राम, भगवती पलिवाल, रिना सय्यद, अश्विनी भावे, भारती परिहार, ज्योती झलके, स्नेहा मेश्राम तसेच परिचर बर्गे, लांजेवार, वलथरे यांनी सहकार्य केले.