शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

गावची शाळा उपक्रम थंडबस्त्यात

By admin | Updated: December 4, 2014 23:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला गावची शाळा आमची शाळा हा अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. मात्र तिसऱ्या वर्षी

सालेकसा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला गावची शाळा आमची शाळा हा अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. मात्र तिसऱ्या वर्षी थंडबस्त्यात असून कागदोपत्रीच सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. प्रथम दोन वर्षात शाळांनी क्रमांक प्राप्त करण्यासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी फार मोठी मेहनत घेत होते. परंतु सत्र २०१४-१५ च्या काळात शिक्षकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम फक्त कागदोपत्रीच सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील १२० जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळा सोडल्या तर इतर शाळेत या उपक्रमाची कोणतीही तयारी सुरू असल्याचे दिसत नाही. मधल्या काळात गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असून प्रभारी पदावर व्ही.यू. पचारे काम करीत होते. आता पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी भोयर पदारूढ झालेले आहे. ते किती प्रमाणात शिक्षकांना क्रियाशील करतात, यावर शाळांची तयारी अवलंबून आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधींचाही सहभाग अपेक्षित होता. पण लोकप्रतिनिधीही रुची दाखवित नाहीत. त्यांची आवड आपल्या प्रभागातील शाळा प्रथम आली पाहिजे यासाठी असते. मूल्यांकनात बसत नसतानाही बसवून क्रमांक मिळवून देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत असल्याची चर्चा मागे शिक्षक मंडळीत होती. त्यामुळे प्रामाणिक, योग्य काम करणाऱ्या शाळांवर अन्यायही झाल्याचे दिसून येत होते. लोकप्रतिनिधींच्या भेटीवर मूल्यांकनात गुण देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उपसभापती, खंडविकास अधिकारी केंद्रप्रमुखांच्या भेटीवर, त्रुटी दाखवून दूर करण्यावर गुण देण्यात आलेले आहेत. शाळेतील समस्या बघून त्या दूर करणे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला पाहिजे, पण असे होताना दिसत नाही. त्यामुळे मूल्याकंनात मिळणारे गुण शाळांना मिळत नाही. लोकप्रतिनिधींचाही उत्साह शिक्षकांसारखाच कमी झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांची भूमिका फक्त शाळेत दिवस काढण्यासाठी असते. बिजेपार परिसरातील शिक्षक केव्हाही येतात आणि केव्हाही जातात. त्यांच्यावर केंद्रप्रमुखाचेही नियंत्रण नाही. सोयी-सवलती घेणे, पण जबाबदारी पार न पाडणे, ही शिक्षकांची भूमिका असल्यामुळे गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम सध्या कागदोपत्रीच दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)