शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भंगारवाले करू लागले आता भाजीविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना ते बंद करून घरात बसावे लागले आहे. यामध्ये शहरात फिरून भंगार खरेदी करणाऱ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ इफेक्ट : रोजगारासाठी धडपड, स्वरुप बदलतेय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून त्यात ‘लॉकडाऊन’मुळे कित्त्येकांचा रोजगार हिरावला गेला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व संस्था धावून आल्या आहेत. मात्र घरात बसून खाणे उचित नसल्याने भंगार खरेदी करणारे आजघडीला भाजविक्रीचे काम करीत असल्याचे दिसून येत आहेत. कसेही चार पैसे हाती यावे व कुणा पुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठीच त्यांची या कठीण परिस्थितीशी लढाई सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना ते बंद करून घरात बसावे लागले आहे. यामध्ये शहरात फिरून भंगार खरेदी करणाऱ्यांचा समावेश आहे. हातठेला घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरून लोकांच्या घरांतील भंगार साहित्य खरेदी करणारे भंगारवाले आपला उदरनिर्वाह चालवितात. मात्र ‘लॉकडाऊन’मध्ये त्यांना आपला हा व्यवसाय बंद करावा लागला आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. समाजात कित्येक गरजू असून त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते व संस्था धावून आल्या आहेत.धान्याचे किटच काय भाजीपाला सुद्धा त्यांना जेवणासाठी पुरविला जात आहे. मात्र आपले शरीर काम करीत असताना कुणावर अशाप्रकारे अवलंबून राहणे योग्य नसल्याने शहरातील अनेक भंगारवाले आज भाजीविक्रीचे काम करीत आहेत. भंगार खरेदीसाठी वापरात येणारे हातठेले त्यांनी आता भाजी ठेवून विक्री करण्याच्या कामात आणले आहे. भंगार खरेदीसाठी दिवसभर फिरून दोन पैसे कमावित होते. आता तसेच दिवसभर फिरून भाजी विकून रोजगार मिळविणारे हे कालचे भंगारवाले आत भाजी विक्रे ता म्हणून सांगत आहेत.गरिबांच्या हक्कावर डल्ला नकोआज आम्ही घरात बसून मदत करणाऱ्यांकडून धान्य व भाजीपाला घेऊन आपला उदरनिर्वाह करणे योग्य नाही. आम्ही हात-पाय चालवून दोन पैसे कमाविण्याच्या स्थितीत आहोत. मात्र खरोखरच ज्यांना या मदतीची गरज आहे. त्यांचा हक्क हिरावण्याचा हा प्रकार होणार. त्यामुळे गरिबांच्या हक्कावर डल्ला न मारता आम्ही भाजी विकून आपला उदरनिर्वाह चालवित आहोत. मदतीची खरी गरज ज्यांना आहे त्यांना मिळणे अधिक गरजेचे असल्याचेही भंगार खरेदी करणारे सांगतात.ठेला भाजी विक्रीच्या कामातपूर्वी कबाडवाले लोकांच्या घरातील भंगार खरेदीसाठी हातठेला घेऊन घरोघरी जात होते. मात्र आता तोच हातठेला त्यांना भाजी विक्रीच्या कामातही उपयोगी पडत आहे. फक्त फरक एवढाच की पूर्वी या ठेल्यावर माल खरेदी करून ठेवला जात होता. तर आता ठेल्यात ठेवलेला माल विकला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही व्यवहार फक्त दोन पैसे कमाविण्यासाठी होत असून यातील ठेला व ठेला मालक मात्र तोच आहे.

टॅग्स :vegetableभाज्या