शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देलागवड क्षेत्रातही होणार वाढ : रब्बी हंगामातील पिकांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ११०० मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने सुध्दा यंदा चांगला झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी १३०० मिमी पाऊस पडणे अपेक्षीत आहे. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सरासरी जवळपास १३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी ७०० ते ८०० मिमी पाऊस पडला होता. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे सिंचन प्रकल्पातील सिंचन साठ्याने मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना निश्चितच फायदा होणार आहे. लागवड क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात सिंचन सुविधेच्या दृष्टीने ९ मध्यम प्रकल्प, २२ लघु प्रकल्प तर ४ मोघे धरण यांच्यासह गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे ३८ जुने मालगुजारी तलाव अस्तित्वात आहेत.यामध्ये बोदलकसा, रेगेपार, संग्रामपूर, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, मानागड, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी असे एकूण ९ मध्यम प्रकल्प तर आक्टीटोला, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, हरी, कालीमाटी, मोगरा, नवेगावबांध, पिपरिया, पांगडी, रेहाडी, राजोली, रिसाला, सोनेगाव, सालेकसा, सडेपार, सेरपार, वडेगाव, जुनेवानी, उमरझरी, ओवारा, वारटोला अशी २२ लघु प्रकल्प आहेत.यंदाच्या खरीप हंगाम सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धरण, मध्यम व लघु प्रकल्पात २१ नोव्हेंबरपर्यंतचा विचार करता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ६७.८८ टक्के साठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. तर मागील वर्षी याच तारखेला फक्त २८.०८ टक्के साठा उपलब्ध होता.लघु प्रकल्पात ७७.८४ टक्के जलसाठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ २९.६३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. जुन्या मालगुजारी तलावातील जलसाठ्यात सुध्दा वाढ झाल्याचे दिसून येते. जुन्या मालगुजारी तलावात यंदा ६९.३१ टक्के साठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ ३३.३३ टक्के साठा उपलब्ध होता.धरणातील जलसाठ्यातही वाढजिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.लघुप्रकल्पांमध्ये मुबलक पाणीएकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व मालगुजारी तलावातील पाण्याची टक्केवारी लक्षात घेता ७२ एवढी होती.तर मागील वर्षी केवळ २९.३१ टक्के एवढी होती. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांना निश्चितच फायदा मिळणार असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प