शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देलागवड क्षेत्रातही होणार वाढ : रब्बी हंगामातील पिकांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ११०० मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने सुध्दा यंदा चांगला झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी १३०० मिमी पाऊस पडणे अपेक्षीत आहे. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सरासरी जवळपास १३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी ७०० ते ८०० मिमी पाऊस पडला होता. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे सिंचन प्रकल्पातील सिंचन साठ्याने मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना निश्चितच फायदा होणार आहे. लागवड क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात सिंचन सुविधेच्या दृष्टीने ९ मध्यम प्रकल्प, २२ लघु प्रकल्प तर ४ मोघे धरण यांच्यासह गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे ३८ जुने मालगुजारी तलाव अस्तित्वात आहेत.यामध्ये बोदलकसा, रेगेपार, संग्रामपूर, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, मानागड, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी असे एकूण ९ मध्यम प्रकल्प तर आक्टीटोला, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, हरी, कालीमाटी, मोगरा, नवेगावबांध, पिपरिया, पांगडी, रेहाडी, राजोली, रिसाला, सोनेगाव, सालेकसा, सडेपार, सेरपार, वडेगाव, जुनेवानी, उमरझरी, ओवारा, वारटोला अशी २२ लघु प्रकल्प आहेत.यंदाच्या खरीप हंगाम सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धरण, मध्यम व लघु प्रकल्पात २१ नोव्हेंबरपर्यंतचा विचार करता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ६७.८८ टक्के साठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. तर मागील वर्षी याच तारखेला फक्त २८.०८ टक्के साठा उपलब्ध होता.लघु प्रकल्पात ७७.८४ टक्के जलसाठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ २९.६३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. जुन्या मालगुजारी तलावातील जलसाठ्यात सुध्दा वाढ झाल्याचे दिसून येते. जुन्या मालगुजारी तलावात यंदा ६९.३१ टक्के साठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ ३३.३३ टक्के साठा उपलब्ध होता.धरणातील जलसाठ्यातही वाढजिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.लघुप्रकल्पांमध्ये मुबलक पाणीएकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व मालगुजारी तलावातील पाण्याची टक्केवारी लक्षात घेता ७२ एवढी होती.तर मागील वर्षी केवळ २९.३१ टक्के एवढी होती. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांना निश्चितच फायदा मिळणार असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प