शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देलागवड क्षेत्रातही होणार वाढ : रब्बी हंगामातील पिकांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ११०० मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने सुध्दा यंदा चांगला झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी १३०० मिमी पाऊस पडणे अपेक्षीत आहे. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सरासरी जवळपास १३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी ७०० ते ८०० मिमी पाऊस पडला होता. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे सिंचन प्रकल्पातील सिंचन साठ्याने मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना निश्चितच फायदा होणार आहे. लागवड क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात सिंचन सुविधेच्या दृष्टीने ९ मध्यम प्रकल्प, २२ लघु प्रकल्प तर ४ मोघे धरण यांच्यासह गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे ३८ जुने मालगुजारी तलाव अस्तित्वात आहेत.यामध्ये बोदलकसा, रेगेपार, संग्रामपूर, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, मानागड, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी असे एकूण ९ मध्यम प्रकल्प तर आक्टीटोला, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, हरी, कालीमाटी, मोगरा, नवेगावबांध, पिपरिया, पांगडी, रेहाडी, राजोली, रिसाला, सोनेगाव, सालेकसा, सडेपार, सेरपार, वडेगाव, जुनेवानी, उमरझरी, ओवारा, वारटोला अशी २२ लघु प्रकल्प आहेत.यंदाच्या खरीप हंगाम सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धरण, मध्यम व लघु प्रकल्पात २१ नोव्हेंबरपर्यंतचा विचार करता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ६७.८८ टक्के साठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. तर मागील वर्षी याच तारखेला फक्त २८.०८ टक्के साठा उपलब्ध होता.लघु प्रकल्पात ७७.८४ टक्के जलसाठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ २९.६३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. जुन्या मालगुजारी तलावातील जलसाठ्यात सुध्दा वाढ झाल्याचे दिसून येते. जुन्या मालगुजारी तलावात यंदा ६९.३१ टक्के साठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ ३३.३३ टक्के साठा उपलब्ध होता.धरणातील जलसाठ्यातही वाढजिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.लघुप्रकल्पांमध्ये मुबलक पाणीएकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व मालगुजारी तलावातील पाण्याची टक्केवारी लक्षात घेता ७२ एवढी होती.तर मागील वर्षी केवळ २९.३१ टक्के एवढी होती. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांना निश्चितच फायदा मिळणार असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प