शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

डास झाले वातावरणाशी समरस

By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST

विविध आजार पसरविणाऱ्या डासांची प्रतिकारक्षमता वाढली असून डास वातावरणाशी समरस झाले आहेत. त्यामुळेच डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा प्रभाव कमी होत आहे,

गोंदिया : विविध आजार पसरविणाऱ्या डासांची प्रतिकारक्षमता वाढली असून डास वातावरणाशी समरस झाले आहेत. त्यामुळेच डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा प्रभाव कमी होत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. डास निर्मूलनासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. तरीसुध्दा डासांचा वाढत्या प्रभावाने विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस नाना प्रकारच्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळे काही रुग्ण उपचाराला साथ मिळू शकत नसल्याने बळी पडत आहेत. ताप, न्युमोमिया, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार जिल्हाभरात वाढत आहे. डास निर्मूलनासाठी आरोग्य विभाग तसेच पालिका प्रयत्नरत आहेत. मात्र डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य विभाग हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अति उष्ण व थंड वातावरणात डास जगू शकत नाहीत. मात्र काही वर्षांत उष्ण व थंड वातावरणातही डासांचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत तिनही ऋतूंमध्ये डास आढळून येत आहेत. त्यातच डेंग्यूसारखे जीवघेणे आजार पसरविणारे एडीस डास वाढत आहेत. डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जाते. जनजागृती झाल्याने नागरिकांनी आता स्वच्छतेकडे लक्ष दिले असले तरी डासांमुळे होणारे आजार दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. डॉक्टरांच्या मते डासांच्या प्रतिकारक्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे डासांना मारक ठरणाऱ्या औषधींचा प्रभाव कमी झाला आहे. डास वातावरणाशी समरस झाल्याने तिनही ऋतूंत डास आढळून येत आहेत.डेंग्यू आजार अरबो व्हायरस या विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार एडीस इजिप्त नावाच्या डासापासून होतो. डेंग्यू विषाणूची वाढ साधारण ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. हा डास मरेपर्यंत दूषित राहून अनेकांना बाधा पोहोचवितो. ४०० मीटरपर्यंत हा डास उडू शकतो. एडीस डासांच्या पायावर पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला टायगर मास्किटो म्हणतात. प्रवास साधनातून हा डास कुठेही जाऊ शकतो. हे डास दिवसांतच चावतात, स्वच्छ पाण्यात राहतात त्यामुळे याला डे बायटर, राजेसी असेही म्हणतात. एडीज डास रोगकारक व रोगवाहक आहे. डासांना संपविण्यासाठी विविध औषधे वापरली जात आहेत. मात्र रिजल्ट शून्य आहे. (शहर प्रतिनिधी)