शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धानाची 1200 रुपये क्विंटलने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 05:00 IST

केंद्र सरकारने रब्बी हंगामात धान खरेदीसाठी यंदा राज्याला प्रथमच धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली. त्यातच जिल्ह्यात रब्बी ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आणि खरेदीची मर्यादा केवळ ९ लाख १२ हजार क्विंटलची दिली, तर ७७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन संकेत स्थळावर नोंदणी केली आहे. यापैकी आतापर्यंत केवळ १३ ते १४ शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहे. जवळपास ५० हजार शेतकऱ्यांचे २६ लाख क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीची दिलेली मर्यादा पूर्ण झाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र पाच दिवसांपूर्वीच बंद झाली. मात्र, मर्यादा वाढवून मिळेल भोळ्या आशेवर शेतकरी असून, ते केंद्राबाहेर धान घेऊन आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या कोंडीचा फायदा खासगी व्यापारी घेत असून, १,९४० रुपये क्विंटलचे धान १,२०० रुपये क्विंटलने खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने रब्बी हंगामात धान खरेदीसाठी यंदा राज्याला प्रथमच धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली. त्यातच जिल्ह्यात रब्बी ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आणि खरेदीची मर्यादा केवळ ९ लाख १२ हजार क्विंटलची दिली, तर ७७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन संकेत स्थळावर नोंदणी केली आहे. यापैकी आतापर्यंत केवळ १३ ते १४ शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहे. जवळपास ५० हजार शेतकऱ्यांचे २६ लाख क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात पडले आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यासाठी सध्या पाठपुरावा केला जात असल्याने शेतकऱ्यांना खरेदीची मर्यादा वाढवून दिली जाईल, ही आशा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये धान भरुन खरेदी केंद्राबाहेर रांगा लावून ठेवल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पाऊस झाल्याने पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. खरिपासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने ते कमी दराने धानाची विक्री करुन पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीचा खासगी व्यापारी पुरेपूर फायदा घेत असून, अत्यंत कमी दराने धानाची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 

रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित - बंद झालेली धान खरेदी पुन्हा सुरू करण्याकरिता तसेच नियमित प्रत्येक हंगामात धान खरेदीकरिता शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोहमारा टी-पाॅईंटरवर बुधवारी (दि. २२) भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

 काही केंद्रांवर खरेदी सुरु 

- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सर्वच धान खरेदी केंद्रांना खरेदी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यानंतरही जिल्ह्यातील काही केंद्रांवर धान खरेदी सुरु असल्याची माहिती आहे. मर्यादा वाढवून मिळाली तर हमीभावाने नाही तर १,४०० रुपये प्रतिक्विंटलने दराने धान खरेदी करू, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. आता जनहित याचिका दाखल करणार - रब्बी हंगामातील २६ लाख क्विंटल धान अजूनही शेतकऱ्यांकडे पडले आहे. ५० हजारांवर शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत, तर केंद्र सरकारने यावर अद्याप तोडगा काढलेला नाही. त्यामुळे हा धान खराब होण्याची शक्यता असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, डॉ. अविनाश काशिवार हे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहेत. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी