शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

अस्वच्छेतेसाठी एकमेकांवरच फोडले खापर

By admin | Updated: November 15, 2014 01:46 IST

महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासन सरसावले. ‘निर्मल व स्वच्छ भारत’ हे नाव देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

गोंदिया : महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासन सरसावले. ‘निर्मल व स्वच्छ भारत’ हे नाव देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात केली. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जोमाने सुरू असली तरी गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले. नगर परिषदेच्या उदासीन कारभारामुळे शहराला आलेले हे गलिच्छ रूप कसे बदलता येईल, त्यासाठी कोण जबाबदार आहेत यावर ‘लोकमत’ने परिचर्चा घडवून आणली. त्यात सत्ताधारी व जुन्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर खापर फोडले. मात्र सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता राखण्याची ग्वाहीही दिली.शहरातील नगर परिषदेवर आता भाजपची सत्ता आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्तात होती. त्यावेळीही हीच परिस्थिती होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी असल्यामुळे त्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात स्वच्छता कुठेच दिसत नसून त्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप जुन्या पदाधिकाऱ्यांनी केला.पदाधिकाऱ्यांची उदासीनता-पंकज यादवगोंदिया शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष व पदाधिकारी उदासीन आहेत. खालच्या स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत भाजपची सत्ता असताना स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या भाजपच्या लोकांनी गोंदिया शहराची दुरवस्था पहावी. आमच्या काळात २ ट्रॅक्टर असताना आम्ही गोंदिया शहर स्वच्छ ठेवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. आता स्वच्छतेसाठी ६-६ ट्रॅक्टर मागविण्यात आले आहेत. त्याचे भाडे महिन्याकाठी २ लाख रुपये मोजले जात असले तरी गोंदिया घाणीच्या साम्राज्यात आहे, ही वर्तमान नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता आहे. (तालुका प्रतिनिधी)