शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अस्वच्छेतेसाठी एकमेकांवरच फोडले खापर

By admin | Updated: November 15, 2014 01:46 IST

महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासन सरसावले. ‘निर्मल व स्वच्छ भारत’ हे नाव देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

गोंदिया : महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासन सरसावले. ‘निर्मल व स्वच्छ भारत’ हे नाव देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात केली. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जोमाने सुरू असली तरी गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले. नगर परिषदेच्या उदासीन कारभारामुळे शहराला आलेले हे गलिच्छ रूप कसे बदलता येईल, त्यासाठी कोण जबाबदार आहेत यावर ‘लोकमत’ने परिचर्चा घडवून आणली. त्यात सत्ताधारी व जुन्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर खापर फोडले. मात्र सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता राखण्याची ग्वाहीही दिली.शहरातील नगर परिषदेवर आता भाजपची सत्ता आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्तात होती. त्यावेळीही हीच परिस्थिती होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी असल्यामुळे त्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात स्वच्छता कुठेच दिसत नसून त्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप जुन्या पदाधिकाऱ्यांनी केला.पदाधिकाऱ्यांची उदासीनता-पंकज यादवगोंदिया शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष व पदाधिकारी उदासीन आहेत. खालच्या स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत भाजपची सत्ता असताना स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या भाजपच्या लोकांनी गोंदिया शहराची दुरवस्था पहावी. आमच्या काळात २ ट्रॅक्टर असताना आम्ही गोंदिया शहर स्वच्छ ठेवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. आता स्वच्छतेसाठी ६-६ ट्रॅक्टर मागविण्यात आले आहेत. त्याचे भाडे महिन्याकाठी २ लाख रुपये मोजले जात असले तरी गोंदिया घाणीच्या साम्राज्यात आहे, ही वर्तमान नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता आहे. (तालुका प्रतिनिधी)