शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जांभळी परिसरात सागवनाची कत्तल

By admin | Updated: December 3, 2014 22:53 IST

वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवन झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र उभे आहे. मागील अनेक दिवसापासून सागवनाची कत्तल करून चिराणची तस्करी होत

सडक/अर्जुनी : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवन झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र उभे आहे. मागील अनेक दिवसापासून सागवनाची कत्तल करून चिराणची तस्करी होत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.मागील अनेक दिवसापासून जांभळी व शेंडा परिसरात सागवनाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. गावठी आऱ्याच्या माध्यमातून कत्तल केलेल्या सागवन झाडाला चिरून त्या पाट्या फर्निचरचे काम करणाऱ्या लोकांना विक्री होत अल्याची माहिती आहे. ही प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याची माहिती आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्त घालत नसल्यामुळे सागवण तस्करांचे चांगलेच फावले आहे. या परिसरात दररोज सागवनाची होणारी कत्तल आपल्याला भोवणार असल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने थातूर मातूर करावाई केली आहे. या प्रकारात तीन छोटे मासे अडकले. मात्र मोठे मासे अजूनही फरार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. सागवन क्रमांक एक चे झाड असल्यामुळे याकडे शासनाची व तस्करांचीही नजर राहते. या वनातील लाकडे चोरणाऱ्या तस्करांशी वनविभागाच्या काही कर्मचारी, अधिकारी यांचे सोटेलोटे असवोत असे बोलल्या जात आहे. वनविभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून सागवन वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्याची मागणी होत आहे. तस्करांनी लाखो रूपयाचा माल चोरून नेला आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्याने त्याचा फायदा घेत वनमाफीयांकडून रात्रीच्या वेळी या सागवनाची तस्करी करण्यात येते. ते माफीये लाकडे वाहनातून वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरही वनकर्मचारी कारवाई करीत नाही. त्या माफियांना संरक्षण देण्याचे काम वन कर्मचारी करीत आहेत. जंगलातील सागवनाची झाडे मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे ते प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी थातूर-मातूर तर कारवाई केली नाही ना अशी शंका अनेकांना येत आहे.सागवनाच्या चिरानची मागणी अधिक असल्यामुळे याच झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. वनाधिकाऱ्यांची रात्रगस्त बंद असल्यामुळे सागवनाची झाडे कापण्यात येत आहेत.या प्रकरणाची चौकशी झाल्यास वनरक्षक व वनमजूर अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही गावातील जंगलात चोरीला गेलेल्या झाडांची शोध मोहीम राबविण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)