शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

जांभळी परिसरात सागवनाची कत्तल

By admin | Updated: December 3, 2014 22:53 IST

वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवन झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र उभे आहे. मागील अनेक दिवसापासून सागवनाची कत्तल करून चिराणची तस्करी होत

सडक/अर्जुनी : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवन झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र उभे आहे. मागील अनेक दिवसापासून सागवनाची कत्तल करून चिराणची तस्करी होत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.मागील अनेक दिवसापासून जांभळी व शेंडा परिसरात सागवनाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. गावठी आऱ्याच्या माध्यमातून कत्तल केलेल्या सागवन झाडाला चिरून त्या पाट्या फर्निचरचे काम करणाऱ्या लोकांना विक्री होत अल्याची माहिती आहे. ही प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याची माहिती आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्त घालत नसल्यामुळे सागवण तस्करांचे चांगलेच फावले आहे. या परिसरात दररोज सागवनाची होणारी कत्तल आपल्याला भोवणार असल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने थातूर मातूर करावाई केली आहे. या प्रकारात तीन छोटे मासे अडकले. मात्र मोठे मासे अजूनही फरार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. सागवन क्रमांक एक चे झाड असल्यामुळे याकडे शासनाची व तस्करांचीही नजर राहते. या वनातील लाकडे चोरणाऱ्या तस्करांशी वनविभागाच्या काही कर्मचारी, अधिकारी यांचे सोटेलोटे असवोत असे बोलल्या जात आहे. वनविभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून सागवन वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्याची मागणी होत आहे. तस्करांनी लाखो रूपयाचा माल चोरून नेला आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्याने त्याचा फायदा घेत वनमाफीयांकडून रात्रीच्या वेळी या सागवनाची तस्करी करण्यात येते. ते माफीये लाकडे वाहनातून वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरही वनकर्मचारी कारवाई करीत नाही. त्या माफियांना संरक्षण देण्याचे काम वन कर्मचारी करीत आहेत. जंगलातील सागवनाची झाडे मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे ते प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी थातूर-मातूर तर कारवाई केली नाही ना अशी शंका अनेकांना येत आहे.सागवनाच्या चिरानची मागणी अधिक असल्यामुळे याच झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. वनाधिकाऱ्यांची रात्रगस्त बंद असल्यामुळे सागवनाची झाडे कापण्यात येत आहेत.या प्रकरणाची चौकशी झाल्यास वनरक्षक व वनमजूर अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही गावातील जंगलात चोरीला गेलेल्या झाडांची शोध मोहीम राबविण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)