शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाऱ्यावर

By admin | Updated: October 11, 2014 01:53 IST

यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले.

सालेकसा : यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. तर वेळेवर दक्षता घेतल्याने अनेकांचा जीव वाचला. एवढे असून सुद्धा व जवळपास दोन महिन्यांपासून तालुक्यात साथरोग पसरण्याची भीती असून आजही तालुक्यातील अनेक गावांत आरोग्य सेवा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. डेंग्यू व मलेरियाचे मच्छर सर्वत्र कायम असूनसुद्धा अनेक गावे अशी आहेत की, त्या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी पोहोचत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी करताना कोणी दिसत नाही अशी खळबळजनक बाब पुढे येत आहे. साथ रोगाची लागण झाल्यानंतर दोन चार दिवस आरोग्य कर्मचारी गावात फिरतात. मात्र त्यानंतर पुन्हा कायमचे बेपत्ता झालेले असतात. यंदा बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोटरा, सिंधीटोला, जोशीटोला या गावांना तर पूर्णपणे डेंग्यू व मलेरियाने आपल्या जबड्यात घेतले होते. यात सिंधी टोला येथे एक महिलेचा मृत्यूसुद्धा झाला तर काही इतर गावांत झालेल्या मृत्यूची नोंद साथरोगांमुळे झाल्याची करण्यात आली नाही. या सर्व प्रकरणांमागे एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, गावागावांत नेमण्यात आलेले आरोग्य सेवक नेहमी बेपत्ता राहणे, प्रत्येक घरांना भेटी न देणे. या बाबत संबंधित पर्यवेक्षकांचे त्यांच्यावर नियंत्रण नसणे तसेच आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षक, आरोग्य सहायक व वैद्यकिय अधिकाऱ्यांपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी समन्वय न ठेवता कोणीच मुख्यालयी राहत नाही. एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम करुन स्वत: कामचुकारपणा करण्याचे प्रकरण जास्त घडत आहेत. तिरखेडी उपकेंद्राचे आरोग्य सेवक दोन वर्षापासून बेपत्ता असूनही त्यांच्या ऐवजी कोणी दुसरा आरोग्य सेवक विभागाने नियुक्त केला नाही. एकिकडे त्या आरोग्य सेवकांची जागा भरलेली दाखविण्यात येते. सालेकसा तालुका हा अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात मोडणारा तालुका आहे. या तालुक्यात गरीब आदिवासी व मागासलेले लोक जास्त प्रमाणात असून ते आरोग्याच्या बाबतीत फारशे सजग नसतात. अशा वेळी त्यांचे आरोग्य सरकारी यंत्रणेच्या भरवशावर जास्त अवलंबून असते. शासकीय आरोग्य सेवा वेळेवर योग्य प्रमाणात मिळत नसेल तर निश्चितच लोकांचे आरोग्य संकटात राहिल. यासाठी आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकात समन्वय असून गरीब आदिवासी लोकांना आरोग्य सेवा देणे कर्मचारी व अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य बनते. परंतु परिस्थिती अगदी विपरीत दिसून येत आहे. एकीकडे कोणताही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तर दुसरीकडे सर्व लोक घरभाडा व इतर भत्ते घेऊन शासनाची दिशाभूल करीत आहेत.परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेला भोगावे लागत आहेत. परसिरात योग्य व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून जि.प. सदस्य कल्यणी कटरे यांनी आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सहायकांंना समज देण्याचे प्रयत्न केले. परंतु याचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्याच प्रमाणे बिजेपार प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत मरकाखांदा येथील सरपंच किरण रामप्रसाद उपराडे यांनीसुद्धा कर्मचारी व पर्यवेक्षक आपल्या गावात लक्ष देत नसल्याची तक्रार केली. परंतु तालुका स्तरावर त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे काम चुकार आरोग्य कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करुन गावातील आरोग्य सेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणी उपराडे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. (तालुका प्र्रतिनिधी)