शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

३५५३ वाहनधारकांकडून वसूल केला पाच लाख रुपयांचा दंड

By admin | Updated: November 18, 2015 01:50 IST

दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह ...

दीड महिन्यातील कारवाई : वाहतूक नियमांची पायमल्लीगोंदिया : दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह विविध वाहतूक नियमांचे धिंडवडे काढणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. दिवाळीच्या एक महिना आधीपासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाच लाखांच्या घरात दंड वसूल करण्यात आला.दिवाळीच्या एक महिना अगोदरपासून जिल्हाभरात वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्याचे धाडसत्र वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून राबविण्यात आले. गोंदिया जिल्हा वाहतुक पोलिसांनी आॅक्टोबर महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या २१५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूल केला आहे. या अवैध वाहतुकीत एक कार असून त्याच्याकडून २ हजार रूपये दंड वसूल केला आहे. १३ जीप चालकांकडून २५ हजार ४०० रूपये, ३ मेटॅडोर चालकांकडून ४ हजार रूपये, ६ ट्रॅक्टर चालकांकडून ६ हजार रूपये, १० ट्रॅव्हल्स चालकांकडून २१ हजार रूपये, ६५ टॅक्सी चालकांकडून ६५ हजार २०० रूपये, ११७ आॅटोरिक्षाकडून ३९ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३१४१ इतर वाहन चालकांकडून ३ लाख २१ हजार १०० रूपये वसूल करण्यात आले. आॅक्टोबर महिन्यात एकूण ३३५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चार लाख ७४ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ दिवसात गोंदियाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने १९७ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १९ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या पंधरवड्यात जिल्ह्यात वाहनांवर झालेल्या कारवाईची माहिती महिनाअखेर मिळणार असल्याने दिवाळीच्या सणातील पंधरवड्यात झालेली कारवाई आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत मोठी असल्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत दिड महिन्याच्या आत पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)वाहन चालकांना सिग्नलचे भान नाहीशहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी गोंदिया शहराच्या चौका-चौकात बसविण्यात आलेले सिग्नल पाहूनच वाहन चालकांनी आपले वाहन चालविणे आवश्यक आहे. परंतु अनेक वाहन चालक हे सिग्नल तोडून वाहने नेतात. त्यामुळे एकाच्या बरोबर इतरही वाहन चालक तोच प्रकार करतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असतो. मात्र जलद वाहने हाकणाऱ्या त्या व्यक्कीला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे संतुलन ढासळेल व अपघात होईल म्हणून त्याचा पाठलाग केला जात नाही.