शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

पावसाअभावी रोवणीला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:57 IST

मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

ठळक मुद्देशेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत : तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता धान भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी संकटात आले आहेत.जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी,धानोरी, बेहळीटोला, थाडेझरी, बोळुंदा, मुरपार, लेंडेझरी, चिचटोला, मुंडीपार या गावातील शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला येथे मागील वर्षीसुद्धा दुष्काळी परिस्थिती होती. या गावातील शेतकऱ्यांनी ८० टक्के धानाची रोवणी केली नव्हती. मात्र या शेतकऱ्यांना शासनाने कुठलीच नुकसान भरपाई दिली नाही.यावर्षी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाची रोवणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने मागील वर्षी सारखेच यावर्षी पुन्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी रोवणीची कामे लगबगीने पूर्ण केली.सुरूवातीला झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. लवकर धानाचे पीक जोमदार यावे, यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचे डोजही दिले. परंतु मागील पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.वाढत्या तापमानामुळे धानाच्या बांध्या कोरड्या पडत असून धान वाळत असल्याचे चित्र आहे. शेतातील रोवणीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सिंचन प्रकल्पांवर भिस्तसध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहे तर जड धानाला एका पाण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी धानाला पाणी देत आहे. तर धानपिके संकटात आल्याचे पाहून सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. मात्र शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. तर काही शेतकऱ्यांची भिस्त पूर्णपणे या सिंचन प्रकल्पांवर असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांची दिशाभूलमागील वर्षी कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या पाच गावात ८० टक्के धानाची रोवणी पावसाअभावी झाली नव्हती. या गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर या पाच गावातील सर्वे करण्याचे निर्देश तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देण्यात आले. मात्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी शेतीचे पंचनामे शेतशिवारात जाऊन न करता टेबलावर बसून सर्वे करुन शासनाकडे पाठविले. यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहिले.कर्मचाऱ्यांवर कारवाहीची मागणीमहसूल आणि कृषी विभागाच्या चुकीच्या अहवालामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस