शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

तलाव व बोडी खोलीकरणात घोळ

By admin | Updated: July 3, 2015 02:16 IST

तालुक्यातील जवरी येथे शासन निधीअंतर्गत सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत गावातील २० लाखांच्या निधीतून तलाव खोलीकरण तर बोळी खोलीकरणावर...

आमगाव : तालुक्यातील जवरी येथे शासन निधीअंतर्गत सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत गावातील २० लाखांच्या निधीतून तलाव खोलीकरण तर बोळी खोलीकरणावर ११ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु या दोन्ही कामात मोठ्या प्रमाणात घोळ करून अभियंता व कंत्राटदारांनी शासन निधीचा गैरवापर केला असल्याची माहिती पुढे आली आहे.आमगाव तालुक्यातील जवरी येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय तर शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळावी याकरिता शासन योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाची कामे मंजूर करण्यात आले. या कामांची देखरेख लघू सिंचन उपविभागीय कार्यालय यांच्याकडे आहे. तर कामावरील निधीचा प्रारुप ठरवून देण्यात आले आहे. गावातील तलावांचे खोलीकरण करण्याच्या कामांकरिता २० लाखांचे नियोजन तर बोळी खोलीकरण व पाणीघाट बांधकाम करण्याकरिता ११ लाखांच्या निधीचे नियोजन शासनातर्फे मंजूर करण्यात आले. परंतु सदर दोन्ही कामांवरील निधीचा बट्ट्याबोळ करण्याची कामे अभियंता व कंत्राटदारांनी केल्याचे पुढे आले आहे.तलाव व बोळी खोलीकरण व पाणघाट बांधकामातील अनियमितता कामावरील प्रत्यक्षदर्शनानेच पुढे येते. तलाव व बोळी खोलीकरण नियमाप्रमाणे करण्यात आले नाही. खोलीकरणाची उंची दर्शवून मजुरांचा निधी व खोलीकरणाच्या दरावर डल्ला मारण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे.सदर बोळी खोलीकरणात ठराविक उंचीवरील खोलीकरणातील घोळ पुढे करुन पाणघाट बांधकामात निकृष्ठ गौण खनिजांचा वापर करुन बांधकाम करण्यात आले आहे. पाणघाट बांधकामातील अनियमिततेमुळे पाणघाटावरील भेगा प्रत्यक्ष पाहणीत दिसून येत आहे. सदर बांधकामावरील मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायत व तहसीलदार यांच्याकडून घेणे बंधनकारक आहे. परंतु लघू पाटबंधारे उपविभागातील अधिकारी व अभियंत्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नियंत्रण नसल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी कामावरील दर्जा खालावून मर्जिप्रमाणे कामे पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली सिंचन सुविधा या घोळामुळे मागे पडली आहे.सदर तलावाचे खोलीकरण, बोळीचे खोलीकरण व पाणघाट बांधकामाची चौकशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व झालेला घोळ उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)