शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या हजेरीने रोवणीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 21:50 IST

यंदा उशिरा पेरण्या आणि इतर कामे मागे पडल्याने रोवणी सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. परंतु आता नुकताच पाऊस सरासरी पडत असून नर्सरी सुद्धा रोवणी योग्य झाल्याने आता सर्वत्र रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : यंदा उशिरा पेरण्या आणि इतर कामे मागे पडल्याने रोवणी सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. परंतु आता नुकताच पाऊस सरासरी पडत असून नर्सरी सुद्धा रोवणी योग्य झाल्याने आता सर्वत्र रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या भाकीतानुसार यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेवर करण्यासाठी सजगता दर्शविली. परंतु मृग आणि आर्द्रनक्षत्र कोरडा गेल्याने अनेक शेतकरी चिंतेत पडले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी यंदा उशिरा पेरण्या केल्या होत्या. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत असला तरी नर्सरी रोवणी योग्य झाली नव्हती. तसेच शेतात पाण्याचा संग्रह सुद्धा होत नव्हता.यामुळे सर्वत्र रोवणीची कामे लांबणीवर गेलेली होती. परंतु आता नर्सरी वाढली असून शेतात योग्य प्रमाणात पाणी साचू लागले आहे. त्यामुळे वरथेंबी पाण्यावर अवलंबीत शेतकºयांनी रोवणीला सुरुवात केली आहे. परंतु यापुढे पाऊस येत राहिला तरच रोवण्या चालू राहतील. अन्यथा पावसाने दडी मारल्यास रोवणीची कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.पंपधारकांनी मारली बाजीशेतात स्वत:ची बोअरवेल आणि पंपची सोय असलेल्या शेतकºयांनी मागील फरकाचा पुरेपूर लाभ घेत आपली रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आणली आहे. खासगी पंप धारकांनी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच धान रोवणी केली होती. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांची नर्सरी रोवणी योग्य झाली आणि मध्यम पडणारा थोडाफार पाऊस जमीनीच्या मशागतीसाठी उपयोगी पडला. त्यामुळे जून महिन्याच्या उत्तरार्ध आणि जुलैन्या सुरुवातीला पंप धारकांनी बोअरवेलच्या पाण्याच्या मदतीने रोवणीच्या कामाला सुरुवात केली. अशात त्यांना मजूर सुद्धा पुरेसा प्रमाणात उपलब्ध झाले. या संधीचा लाभ घेत जवळपास सर्वच बोअरवेल धारकांनी आपली रोवणी जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत पूर्ण केलेली दिसत आहे. मात्र आता वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतातील रोवणी बाकी असून नियमित पाऊस आल्यास सर्वांंची रोवणी योग्य वेळेवर होऊ शकेल. सध्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. पुढे अशीच अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी