शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

‘आरक्षण बचाव’साठी रस्त्यावर

By admin | Updated: August 11, 2014 23:59 IST

देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाला घटनेने मिळालेल्या आरक्षणावर गदा न येऊ देण्याचा संकल्प करीत आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी गोंदियात

भव्य मोर्चाने दणाणले गोंदिया : धनगर समाजाचे अतिक्रमण सहन न करण्याचा आदिवासींचा निर्धारगोंदिया : देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाला घटनेने मिळालेल्या आरक्षणावर गदा न येऊ देण्याचा संकल्प करीत आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी गोंदियात भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत ३ किलोमीटर अंतर पार करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी संघ, नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी हलबा/हलबी संघटना, गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समिती, अखिल भारतीय धृव गोंड समाज संघटना आदी संघटनांच्या पुढाकाराने आ.रामरतन राऊत, अ‍ॅड.नामदेवराव किरसान यांच्या नेतृत्वात आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी आदिवासी समाजातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी विविध फलकं घेऊन आणि पिवळे शेले पांघरून सकाळपासून गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जमले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा मोर्चा नेहरू चौक, गोरेलाल चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, मनोहर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या हक्कावर येऊ पाहात असलेली ही गदा परतवून लावण्याचा निर्धार व्यक्त केला. येथील मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाला संविधानाने दिलेल्या अधिकारावर दुसरे कोणी हक्क सांगत असतील ते खपवून घेणार नाही. या लढ्यात कोणताही पक्षीय विचार न करता आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढण्यास तयार राहणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यानंतर जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना आरक्षण बचाव समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आदिवासी विकासमंत्री यांच्या नावे देण्यात आलेल्या या निवेदनात नमुद केल्यानुसार, राज्यात सर्वच राजकीय पक्षांचे लोक आपल्या मतदारक्षेत्रात धनगर समाजाच्या लोकांना आरक्षणाचे आमिष देऊन उसकावत असल्याचा व त्यातून आपला राजकीय डाव साधत असल्याचा आरोप केला. वास्तविक धनगर समाज किंवा इतर जातीत आणि आदिवासी समाजाची प्रथा, परंपरा, रितीरिवाज आणि संस्कृती यात कोणतेही साम्य नाही. परंतू आदिवासी समाजाचे आरक्षण लाटून त्यांच्या नोकऱ्या, सुविधा आणि राजकीय पदे लाटण्यासाठीच हे षड्यंत्र असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले.या प्रकारामुळे समस्त आदिवासी समाजबांधवांमध्ये असंतोषाची भावना भडकली आहे. त्यामुळे धनगर समाज किंवा इतर कोणत्याही जातीच्या लोकांना अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात स्थान न देता आदिवासींची अस्मिता आणि आरक्षणाचे संरक्षण करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तानेश ताराम, हिरालाल भोई, दुर्गाप्रसाद कोकोडे, रंदलाल अरकला, वसंत पुराम, पी.बी.टेकाम, मोतीराम सयाम, प्रदीप उईके, शिलाताई उईके, प्रभाकर कुंभरे, जियालाल पंधरे, विजय मडावी या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)