शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांकडून ग्रामीण भागात संसर्गाचा अधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल.

ठळक मुद्देविलगीकरण प्रक्रि या व्हावी : स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : ग्रामीण भागातील काही युवक व काही माणसे रोजगारासाठी पुणे-मुंबई, नागपुर यासारख्या मोठया शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ते आता गावाकडे परतत आहेत. मात्र त्यांची आरोग्य तपासणी केली जात नसल्याने त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस विभाग, महसूल विभागातील स्थानिक कर्मचारी यांनी या बाबींकडे लक्ष द्यावे. अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली आहे.रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल. एक सामाजिक दायित्व म्हणून या भयावह रोगापासून स्वत:चा, कुटुंबियांचा व समाजाचा विचार करून विलगीकरण प्रक्रि येला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु सध्या असे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही.चान्ना कोडका, नवेगावबांध व परिसरातील अनेक तरु ण रोजगारानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात जात असतात. अशा बाहेरून आलेल्यांनी स्वत:हूनच तलाठी, पोलीस स्टेशन, अंगणवाडी कार्यकर्त्यांना, आरोग्यसेविका, सेवक यांना द्यायला पाहिजे. जेणेकरून उद्या होणारा संक्र मण आजच रोखता येईल. पण असे फारसे होत नाही. बाहेरून आलेले पुढे यायला तयार नसतात. त्यांचे कुटुंबीय यात पुढाकार घ्यायला तयार नसतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर पुढे होणारा धोका वेळीच टाळता येईल.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन, संभाव्य कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाची व राज्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. सामाजिक अंतर व गर्दी टाळणे या दोन गोष्टी जरी आपण एक जबाबदारी म्हणून पार पाडली तरच बाहेरच्या संसर्गापासून स्वत:चा कुटुंबियांचा व गावकऱ्यांचा बचाव करू शकतो. या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या