शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

मजुरांकडून ग्रामीण भागात संसर्गाचा अधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल.

ठळक मुद्देविलगीकरण प्रक्रि या व्हावी : स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : ग्रामीण भागातील काही युवक व काही माणसे रोजगारासाठी पुणे-मुंबई, नागपुर यासारख्या मोठया शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ते आता गावाकडे परतत आहेत. मात्र त्यांची आरोग्य तपासणी केली जात नसल्याने त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस विभाग, महसूल विभागातील स्थानिक कर्मचारी यांनी या बाबींकडे लक्ष द्यावे. अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली आहे.रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल. एक सामाजिक दायित्व म्हणून या भयावह रोगापासून स्वत:चा, कुटुंबियांचा व समाजाचा विचार करून विलगीकरण प्रक्रि येला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु सध्या असे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही.चान्ना कोडका, नवेगावबांध व परिसरातील अनेक तरु ण रोजगारानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात जात असतात. अशा बाहेरून आलेल्यांनी स्वत:हूनच तलाठी, पोलीस स्टेशन, अंगणवाडी कार्यकर्त्यांना, आरोग्यसेविका, सेवक यांना द्यायला पाहिजे. जेणेकरून उद्या होणारा संक्र मण आजच रोखता येईल. पण असे फारसे होत नाही. बाहेरून आलेले पुढे यायला तयार नसतात. त्यांचे कुटुंबीय यात पुढाकार घ्यायला तयार नसतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर पुढे होणारा धोका वेळीच टाळता येईल.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन, संभाव्य कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाची व राज्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. सामाजिक अंतर व गर्दी टाळणे या दोन गोष्टी जरी आपण एक जबाबदारी म्हणून पार पाडली तरच बाहेरच्या संसर्गापासून स्वत:चा कुटुंबियांचा व गावकऱ्यांचा बचाव करू शकतो. या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या