शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो, लसन १६० रुपये किलो आहे. कुठल्याही भाजीचे दर हे ५० रूपये प्रती किलोच्यावर असल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.

ठळक मुद्देगृहिणींचे बजेट बिघडले : भाजीपाल्याचे दर कडाडले

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. तर दुसरीकडे महागाईने डोकेवर काढले आहे. मागील आठवडाभरापासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गृहीणींचे बजेट बिघडले आहे.सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो, लसन १६० रुपये किलो आहे. कुठल्याही भाजीचे दर हे ५० रूपये प्रती किलोच्यावर असल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.५०० रुपयांची नोट खर्च झाल्यावर थैलीभर भाजीपाला येत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. तर गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. लसणाचे भाव सुद्धा दर आठवड्यात वाढत आहेत. त्यामुळे भाजीला लसणाचा फोडणी देणे महाग झाले आहे. कोरोनामुळे अद्यापही उद्योग धद्यांची गाडी रुळावर आली नाही. अनेकांच्या हाताला रोजगार नाही. अशात आता वाढत्या महामाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जीवन जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.भाजीबाजारात गेल्यावर कुठल्याही भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्यावरच असल्याने भाजीपाला कसा खरेदी करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. अशात घरखर्च साभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- उर्मिला बावनथडे (गृहीणी)हिरव्या भाजीपाल्यासह कडधान्याच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. वाढत्या महामागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.- राजेश हरिणखेडे.

टॅग्स :vegetableभाज्या