शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

३० एकरातील धानपिक संकटात

By admin | Updated: April 23, 2016 01:44 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला.

पानगावच्या तलावात ठणठणाट : संपूर्ण पाणी आटल्याने उन्हाळी पिकांना फटकासालेकसा : तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला. या तलावाच्या पाण्याच्या भरवसावर लावलेले ३० एकरांतील धानपिक संकटात आले आहे. तलाव आटल्याने गौरीटोला पानगावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.जवळपास १०० एकरांत पावसाच्या खरीप पिकासाठी वेळोवेळी वरदान ठरणारा तसेच ६० एकर क्षेत्रात उन्हाळी पिकासाठी पाण्याची पूर्तता करणारा पानगाव येथील मोठा तलावात यंदा पूर्ण ठणठणाट झाल्याने एप्रिल महिन्यातच लक्षात आले. या तलावाच्या पाण्याने दरवर्षी ४०-५० एकरातील पीक काढण्यासाठी येथील पाणी शेवटपर्यंत पुरते. तसेच कपडे धुणे, जनावरे धुणे, गाई, म्हशी, बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना वाहनाना विविध कामासाठी या तलावाच्या पाणी वापरता येते. दरवर्षी या तलावात पाणी राहात होते. वर्षभर विविध कामासाठी पाण्याचा उपयोग करून ही या तलावात जलसाठा पावसाळा लागेपर्यंत राहात होता. परंतु यंदा या तलावाची अशी दुर्दशा बघून सगळेच अवाक झाले आहेत. हा तलाव राज्यमार्ग २४९ आमगाव-सालेकसा-डोंगरगड मार्गावर रस्त्यालगत आहे. या तलावात पाणी साठा याचा जवळून प्रवास करणे आनंददायी वाटत असते. परंतु या अनेक वर्षानंतर या तलावाचे सौंदर्य व वैभव नष्ट झाले आहे. यंदा तलावाच्या जवळून प्रवास करताना नैराश्य पूर्ण अनुभव येत आहे. या तलावातून निघणारा कालवा हा संपूर्ण पानगाव परिसराला गौरी आणि बच्चनटोला परिसराला पाणी पुरवठा होत असून वर्षभर या कालव्याचे पाणी विविध उपयोगासाठी वापरणे महिलांना सोयीस्कर ठरत होते. परंतु आता पाण्याअभावीे मोठा त्रास होत आहे. सर्वात मोठे संकट म्हणजे या तलावाच्या भरवश्यावर लावलेले धानपीक संकटात सापडले आहे. धान पिकाला गळा दाबण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. येथील जलसाठा अल्प असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानपीक घ्यायचे नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी परिस्थिती न समजून घेता चूक केली याचा फटका त्यांना बसत आहे.(तालुका प्रतिनिधी)