शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

३० एकरातील धानपिक संकटात

By admin | Updated: April 23, 2016 01:44 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला.

पानगावच्या तलावात ठणठणाट : संपूर्ण पाणी आटल्याने उन्हाळी पिकांना फटकासालेकसा : तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला. या तलावाच्या पाण्याच्या भरवसावर लावलेले ३० एकरांतील धानपिक संकटात आले आहे. तलाव आटल्याने गौरीटोला पानगावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.जवळपास १०० एकरांत पावसाच्या खरीप पिकासाठी वेळोवेळी वरदान ठरणारा तसेच ६० एकर क्षेत्रात उन्हाळी पिकासाठी पाण्याची पूर्तता करणारा पानगाव येथील मोठा तलावात यंदा पूर्ण ठणठणाट झाल्याने एप्रिल महिन्यातच लक्षात आले. या तलावाच्या पाण्याने दरवर्षी ४०-५० एकरातील पीक काढण्यासाठी येथील पाणी शेवटपर्यंत पुरते. तसेच कपडे धुणे, जनावरे धुणे, गाई, म्हशी, बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना वाहनाना विविध कामासाठी या तलावाच्या पाणी वापरता येते. दरवर्षी या तलावात पाणी राहात होते. वर्षभर विविध कामासाठी पाण्याचा उपयोग करून ही या तलावात जलसाठा पावसाळा लागेपर्यंत राहात होता. परंतु यंदा या तलावाची अशी दुर्दशा बघून सगळेच अवाक झाले आहेत. हा तलाव राज्यमार्ग २४९ आमगाव-सालेकसा-डोंगरगड मार्गावर रस्त्यालगत आहे. या तलावात पाणी साठा याचा जवळून प्रवास करणे आनंददायी वाटत असते. परंतु या अनेक वर्षानंतर या तलावाचे सौंदर्य व वैभव नष्ट झाले आहे. यंदा तलावाच्या जवळून प्रवास करताना नैराश्य पूर्ण अनुभव येत आहे. या तलावातून निघणारा कालवा हा संपूर्ण पानगाव परिसराला गौरी आणि बच्चनटोला परिसराला पाणी पुरवठा होत असून वर्षभर या कालव्याचे पाणी विविध उपयोगासाठी वापरणे महिलांना सोयीस्कर ठरत होते. परंतु आता पाण्याअभावीे मोठा त्रास होत आहे. सर्वात मोठे संकट म्हणजे या तलावाच्या भरवश्यावर लावलेले धानपीक संकटात सापडले आहे. धान पिकाला गळा दाबण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. येथील जलसाठा अल्प असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानपीक घ्यायचे नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी परिस्थिती न समजून घेता चूक केली याचा फटका त्यांना बसत आहे.(तालुका प्रतिनिधी)