शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सेंद्रिय शेतीतून ८१ एकरात श्री पद्धतीने भात लागवड

By admin | Updated: August 11, 2014 23:59 IST

जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या धानाची लागवड करताना लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे कमीत कमी लागवड खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न या तत्वाचे पालन करण्यासाठी अदानी फाऊंडेशनने

गोंदिया : जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या धानाची लागवड करताना लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे कमीत कमी लागवड खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न या तत्वाचे पालन करण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तिरोडा परिसरातील पाच गावातील शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने ‘श्री’ (सिस्टम आॅफ राईस इंटेन्सिफिकेशन) पद्धतीने कशी भात लागवड करावी याचे प्रशिक्षण त्यांना दिले. विशेष म्हणजे हे पिक सेंद्रीय पद्धतीने घेतले जाणार आहे.अदानी फाऊंडेशनने तिरोडा परिसरातील जी गावे दत्तक घेतली आहेत त्यापैकी ५ गावांमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’च्या रूपात शेतकऱ्यांना या पद्धतीने भात लागवडीसाठी प्रवृत्त केले जात आहे. यात तांत्रिक पद्धतीने जास्त उत्पन्न घेण्याचा आणि कमी खर्चाच्या सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी अदानी फाऊंडेशनने हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यात कवलेवाडा, जमुनिया, चिरेखनी, चिखली आणि भिवापूर येथील शेतकरी यात गावांतील १५० शेतकऱ्यांना तीन बॅचमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या शेतकऱ्यांनी नंतर आपापल्या गावांमध्ये जाऊन इतर शेतकऱ्यांना याबाबतची शास्त्रोक्त माहिती दिली. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने धानाची लागवड करण्याची तयारी दर्शविली त्या प्रत्येकाला ३ किलो धानाचे बियाणे देण्यात आले. यातून या पायलट प्रोजेक्टसाठी ८१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.धानाच्या पऱ्हांची वाढ झाल्यानंतर कृषी सहायकांच्या मदतीने एका शेतात धानाच्या रोपांची योग्य पद्धतीने कशी लागवड करायची याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. सदर शेतकऱ्यांना सेंद्रीय खत निर्मितीसाठी २०० प्लॅस्टिकचे ड्रमही वाटप करण्यात आल्याचे अदानी फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले .(जिल्हा प्रतिनिधी)