शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

स्वतंत्र विदर्भासाठी क्रांतिदिनी ‘रेल देखो-बस देखो’ आंदोलन

By admin | Updated: July 27, 2014 23:48 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिसाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा यासाठी ‘जनमंच’ या संघटनेच्या वतीने ‘लढा विदर्भाचा’ ही मोहीम राबविली जात आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात रविवारी

गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिसाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा यासाठी ‘जनमंच’ या संघटनेच्या वतीने ‘लढा विदर्भाचा’ ही मोहीम राबविली जात आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात रविवारी त्यासाठी जनजागृतीपर सभा पार पडली. यात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी येत्या ९ आॅगस्ट या क्रांती दिनी संपूर्ण विदर्भात ‘रेल देखो-बस देखो’ हे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी नागपूरवरून आलेले जनमंचचे सल्लागार चंद्रकांत वानखेडे, विदर्भस्तरीय अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर, सचिव प्रमोद पांडे, उपसचिव राम आखरे, प्रा. शरद पाटील, प्रकाश इटनकर, सदस्य किशोर गुल्हाने, श्रीकांत दौड, टी.बी. जगताप, श्रीरसागर, विनोद बोरकुरे, तेजस केने, राहुल जडे, भगवान राठी, कृ.द. दाभोळकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भातील जनतेचा विकास होऊ शकणार नाही, असे सांगत वेगळ्या विदर्भाची मागणी कशी रास्त आहे हे पटवून दिले. केंद्रात सत्ताबदल झाला आहे. नवीन सरकार लहान राज्यांच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे. १९९७ मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या पक्ष अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठरावदेखील केला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी व्हावी, अशी विदर्भवासीयांची अपेक्षा आहे. ‘आधी विदर्भ, मगच निवडणुका’ अशी जनभावना असल्याचे नेत्यांनी सांगितले.जनमंचचे दाभोळकर व आखरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे झालेल्या जनमत चाचणीद्वारे जनमत विदर्भवासीयांचे मत स्पष्ट झाल्याचे सांगितले. लाखो लोकांनी मतदानात भाग घेतला. यात ९७ टक्के लोकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने मतदान केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ९ आॅगस्टच्या ‘रेल देखो-बस देखो’ आंदोलनात रेल्वे प्लॅटफॉर्मवर व जेथे रेल्वेस्थानक नाही तिथे एस.टी.च्या प्रमुख बस स्थानकांवर नागरिक सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत एकत्र येतील व त्यादरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना स्वतंत्र विदर्भ राज्याचा ‘विदर्भ बंधन धागा’ बांधतील असे यावेळी सांगण्यात आले.स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झाली तरच सर्व समस्या आपोआप सुटल जातील व आम्हाला जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणेही सोपे जाईल. विदर्भातील साधन संपत्तीचा लाभ विदर्भवासीयांना घेता येईल, असे सांगून विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.(प्रतिनिधी)