शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने फेरले शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे.

ठळक मुद्देलागवड खर्च कसा निघणार : शेतकऱ्यांवर आली कर्जबाजारी होण्याची वेळ

गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर क्षेत्रात हलक्या धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा कापणी केलेल्या हलक्या धानाला फटका बसला. जवळपास ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे. मात्र मागील आठवड्यात सलग तीन चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने आणि बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस आणि वाऱ्यामुळे हजारो हेक्टरमधील धान झोपल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर केलेले काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन घेतलेल्या पिकावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा चिंतेचे ढग निमार्ण झाले आहे.कर्जाची परतफेड कशी करणारमाझी पाच एकर शेती असून खरीपात त्यात धानाची लागवड केली होती. यासाठी जवळपास ६५ हजार रुपयांचा लागवड खर्च आला. शेतीसाठी यंदा ५० हजार रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून घेतले. मात्र आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले.त्यामुळे लागवड खर्च भरुन निघणे कठीण असून कर्जाची परतफेड कशी करणार असे निहारीलाल दमाहे म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती