शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

परतीच्या पावसाने फेरले शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे.

ठळक मुद्देलागवड खर्च कसा निघणार : शेतकऱ्यांवर आली कर्जबाजारी होण्याची वेळ

गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर क्षेत्रात हलक्या धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा कापणी केलेल्या हलक्या धानाला फटका बसला. जवळपास ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे. मात्र मागील आठवड्यात सलग तीन चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने आणि बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस आणि वाऱ्यामुळे हजारो हेक्टरमधील धान झोपल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर केलेले काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन घेतलेल्या पिकावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा चिंतेचे ढग निमार्ण झाले आहे.कर्जाची परतफेड कशी करणारमाझी पाच एकर शेती असून खरीपात त्यात धानाची लागवड केली होती. यासाठी जवळपास ६५ हजार रुपयांचा लागवड खर्च आला. शेतीसाठी यंदा ५० हजार रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून घेतले. मात्र आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले.त्यामुळे लागवड खर्च भरुन निघणे कठीण असून कर्जाची परतफेड कशी करणार असे निहारीलाल दमाहे म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती