शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परतीच्या पावसाने १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:00 AM

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण : शासनाला पाठविणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा खरीप हंगामातील १४०० हेक्टरमधील धानाला फटका बसला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे ३३ टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. यंदा जवळपास ४० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी हलक्या धानाची लागवड केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या धानाची कापणी देखील केली होती. तर काही शेतकऱ्यांनी मळणी सुरु केली होती. मात्र याच दरम्यान सलग आठवडाभर पाऊस झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर संपूर्ण हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे. यात १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.याबाबतचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. हा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.केवळ २०६ शेतकऱ्यांच्या तक्रारीपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागते. मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र विमा कंपनीकडे केवळ २०६ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण कृषी विभागातंर्गत करण्यात आले. १४०० हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला असून यासंबंधिचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येईल.- गणेश घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती