शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसले होते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे घवघवीत यश : १९ महाविद्यालयांतील १३९५ विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एकूण १३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यापैकी गुणवत्ता श्रेणीत ३६ प्रथम श्रेणीत ६६१, द्वितीय श्रेणीत ६७४ तर उत्तीर्ण श्रेणीत २४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.येथील सालेकसा ज्युनिअर कॉलेज मधील १७६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५ टक्के लागला. कावराबांध येथील जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज मधील ३८ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.४७ टक्के निकाल लागला. तिरखेडी येथील ग्राम विकास कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.९१ टक्के निकाल लागला असून येथील ४८ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. झालीया येथील गवराबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून येथील २४ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला विभागातून ६४ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७३.४३ टक्के निकाल लागला आहे. सोनपुरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील ८७ पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९४.२५ टक्के निकाल लागला आहे. शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळाचा विज्ञान आणि कला दोन्ही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत १३ पैकी १३ तर कला शाखेत ३६ पैकी सर्व ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मक्काटोला येथील पंचशील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ९५ टक्के लागला. विज्ञान शाखेतील ७० पैकी ७० तर कला शाखेतील ६३ पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आमगाव खुर्द येथील श्रीनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील ३४ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७९.४१ टक्के निकाल लागला आहे. पिपरीया येथील श्यामसुंदर बोरकर वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.५६ टक्के निकाल लागला असून येथील ४१ पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बिजेपार येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विज्ञान शाखेतून ३८ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेतून ३५ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.३६ टक्के तर कला शाखेचा ८२.८५ टक्के निकाल लागला आहे. कोटजमूरा येथील शहीद अवंती कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत ७८ पैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेत २० पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथील शंकरलाल अग्रवाल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२२ पैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९२.६२ टक्के निकाल लागला.कावराबांध येथील लालसिंग मच्छिरके विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील ९८ पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९८.९७ टक्के लागला. लोहारा येथील नारायणभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.१५ टक्के लागला असून येथील ५२ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरेकसा येथील श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.२६ टक्के निकाल लागला असून येथील ७३ पैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाकानिंबा येथील राणी अवंतीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील ५८ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५.८६ टक्के लागला. कवराबांध येथील जी.के.विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १०६ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.२२ टक्के लागला. तर येथील एसआरबी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील ३७ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेत १२ पैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.२९ टक्के तर कला शाखेचा ४१.६६ टक्के निकाल लागला आहे.मौखिक परीक्षा होणार बंदमौखिक परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्याना मौखिक परीक्षेत भरभरुन गुण देण्यात आले. त्यामुळे निकालाची टक्केवारी ९० वर गेली. मात्र पुढील सत्रापासून मौखिक परीक्षा बंद होणार असून टक्केवारी अशीच वाढलेली राहील का याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. मौखिक परीक्षा कायम राहावी अशी इच्छा सुद्धा काही पालक वर्ग व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण