शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जि.प.व पं.स.चे आरक्षण जाहीर, आता तिकिटासाठी धडपड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 17:24 IST

गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. यापैकी २७ जागा सर्वसाधारण, ओबीसी १०, एसटी १०, एससी ५ असे आरक्षण काढण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या चार-चार जागा कमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देवेध जि.प.निवडणुकीचे : आरक्षणामुळे काहींचा हिरमोढ तर काहींना दिलासा

गोंदिया : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्कलनिहाय आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण हे ५० टक्क्यांच्या वर नको, असा निर्वाळा दिला होता. त्याची अंमलबजावणी करीत राज्य निवडणूक आयोगाने ओबीसीच्या जागा कमी करून, आरक्षण ५० टक्के करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलनिहाय सुधारित आरक्षण सोडत काढली. यात काही दिग्गज माजी जिल्हा परिषद सदस्यांना फटका बसला असून, सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेण्याची वेळ आली.

गोंदिया जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. त्यापूर्वीच निवडणुका हाेऊन नवीन पदाधिकारी आणि सदस्य पदारूढ होणे आवश्यक होते, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर गेल्या. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण ५० टक्क्यांच्या वर आरक्षण नको, असा निर्वाळा दिला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्कलनिहाय सुधारित आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. यापैकी २७ जागा सर्वसाधारण, ओबीसी १०, एसटी १०, एससी ५ असे आरक्षण काढण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या चार-चार जागा कमी झाल्या आहेत. सर्वसाधारणच्या २७ जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहे. त्यानुसार, १४ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या.

५३ पैकी अनेक मतदारसंघ आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव झाल्याने, काही माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या अर्धांगिनी निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतर आता तिकिटासाठी सर्वच पक्षाच्या उमदेवारांची धडपड सुरू झाली आहे, तर राजकीय पक्षांनीही आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच गुलाबी थंडीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

अनेक मतदारसंघ जनरल

जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ मतदारसंघांपैकी बरेच मतदारसंघ सर्वसाधारण निघाले, तर काही मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे नागरा, एकोडी, आसोली, खमारी, फुलचूर, अर्जुनी, सेजगाव, सुकडी, ठाणा, वडेगाव या मतदारसंघात अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये तिकिटासाठीही चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.

महिला सदस्यांची संख्या वाढणार

जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ जागा असून, यापैकी ५० टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत, तर सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती आणि जमातीचे मतदारसंघ आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीत महिला सदस्यांची संख्या अधिक पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये.

परशुरामकर यांचा मतदारसंघ सुरक्षित

जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी शुक्रवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांचा मतदारसंघ सर्वसाधारण झाला. त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार नसून, ते याच मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमाविणार असल्याचे बोलले जाते.

जुन्यांवर विश्वास की नव्यांना संधी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्कलनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर, आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तिकीट वाटप करताना, राजकीय पक्ष जुन्याच सदस्यांवर विश्वास व्यक्त करीत, त्यांना पुन्हा संधी देतात की नवा गडी हे सूत्र लावतात, हेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकzpजिल्हा परिषदZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती