शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पुन्हा बदलणार आरक्षण

By admin | Updated: May 1, 2015 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे.

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे. दुसऱ्या सोडतीनंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी २ मे रोजी ही सोडत काढली जाणार आहे.अवघ्या दोन-अडीच महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. परंतु त्यावर ४८ आक्षेप आले. तिसऱ्यांदा सोडत काढली जाणार असल्याने पुन्हा संभाव्य उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज दिसणार आहे. ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जिल्हा परिषद क्षेत्राचे व १०६ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणासाठी १७ एप्रिलपर्यंत आक्षेपाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४८ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले. यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ तर पंचायत समिती गणांसाठी ३५ आक्षेपांचा समावेश होता. या सर्व आक्षेपांची सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव वगळता अन्य तालुक्यातील पंचायत समितीचे आक्षेप मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे. गोरेगाव पंचायत समितीत एक आक्षेप कायम राहिल्याने या तालुक्यातील गणांच्या आरक्षणाची घोषणा नव्याने २ मे रोजी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ आक्षेप असल्याने संपूर्ण ५३ जि.प. क्षेत्राच्या आरक्षणाचीही नव्याने घोषणा करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आरक्षणाला आक्षेपांचे ग्रहणयापूर्वी २ वेळा जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. परंतु पहिल्या घोषणेनंतर सहा तालुक्यांना नगर पंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना निघाल्याने पहिले आरक्षण रद्द झाले. त्यानंतर नव्याने जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांची रचना करुन नवे आरक्षण ४ एप्रिल रोजी घोषित करण्यात आले होते. या आरक्षणालाही आक्षेपाचे ग्रहण लागल्याने आता तिसऱ्यांदा २ मे रोजी आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणात वारंवार होत असलेल्या या बदलामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव वरखाली होत आहे. आरक्षण निश्चित न झाल्याने आपले क्षेत्र निवडणे संभाव्य उमेदवारांसाठी कठीण जात आहे. ४ एप्रिल रोजी झालेल्या घोषणेनंतर काही उमेदवारांनी संभाव्य क्षेत्र निवडून त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करणे सुरु केले होते. मात्र आक्षेपामुळे या उमेदवारांचे मनसुबे उधळल्या गेले आहेत. त्यामुळे आता संभाव्य उमेदवारांच्या नजरा २ मे रोजी काढल्या जाणाऱ्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.