शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पुन्हा बदलणार आरक्षण

By admin | Updated: May 1, 2015 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे.

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे. दुसऱ्या सोडतीनंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी २ मे रोजी ही सोडत काढली जाणार आहे.अवघ्या दोन-अडीच महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. परंतु त्यावर ४८ आक्षेप आले. तिसऱ्यांदा सोडत काढली जाणार असल्याने पुन्हा संभाव्य उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज दिसणार आहे. ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जिल्हा परिषद क्षेत्राचे व १०६ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणासाठी १७ एप्रिलपर्यंत आक्षेपाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४८ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले. यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ तर पंचायत समिती गणांसाठी ३५ आक्षेपांचा समावेश होता. या सर्व आक्षेपांची सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव वगळता अन्य तालुक्यातील पंचायत समितीचे आक्षेप मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे. गोरेगाव पंचायत समितीत एक आक्षेप कायम राहिल्याने या तालुक्यातील गणांच्या आरक्षणाची घोषणा नव्याने २ मे रोजी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ आक्षेप असल्याने संपूर्ण ५३ जि.प. क्षेत्राच्या आरक्षणाचीही नव्याने घोषणा करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आरक्षणाला आक्षेपांचे ग्रहणयापूर्वी २ वेळा जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. परंतु पहिल्या घोषणेनंतर सहा तालुक्यांना नगर पंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना निघाल्याने पहिले आरक्षण रद्द झाले. त्यानंतर नव्याने जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांची रचना करुन नवे आरक्षण ४ एप्रिल रोजी घोषित करण्यात आले होते. या आरक्षणालाही आक्षेपाचे ग्रहण लागल्याने आता तिसऱ्यांदा २ मे रोजी आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणात वारंवार होत असलेल्या या बदलामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव वरखाली होत आहे. आरक्षण निश्चित न झाल्याने आपले क्षेत्र निवडणे संभाव्य उमेदवारांसाठी कठीण जात आहे. ४ एप्रिल रोजी झालेल्या घोषणेनंतर काही उमेदवारांनी संभाव्य क्षेत्र निवडून त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करणे सुरु केले होते. मात्र आक्षेपामुळे या उमेदवारांचे मनसुबे उधळल्या गेले आहेत. त्यामुळे आता संभाव्य उमेदवारांच्या नजरा २ मे रोजी काढल्या जाणाऱ्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.