शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बदलणार आरक्षण

By admin | Updated: May 1, 2015 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे.

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे. दुसऱ्या सोडतीनंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी २ मे रोजी ही सोडत काढली जाणार आहे.अवघ्या दोन-अडीच महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. परंतु त्यावर ४८ आक्षेप आले. तिसऱ्यांदा सोडत काढली जाणार असल्याने पुन्हा संभाव्य उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज दिसणार आहे. ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जिल्हा परिषद क्षेत्राचे व १०६ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणासाठी १७ एप्रिलपर्यंत आक्षेपाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४८ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले. यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ तर पंचायत समिती गणांसाठी ३५ आक्षेपांचा समावेश होता. या सर्व आक्षेपांची सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव वगळता अन्य तालुक्यातील पंचायत समितीचे आक्षेप मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे. गोरेगाव पंचायत समितीत एक आक्षेप कायम राहिल्याने या तालुक्यातील गणांच्या आरक्षणाची घोषणा नव्याने २ मे रोजी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ आक्षेप असल्याने संपूर्ण ५३ जि.प. क्षेत्राच्या आरक्षणाचीही नव्याने घोषणा करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आरक्षणाला आक्षेपांचे ग्रहणयापूर्वी २ वेळा जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. परंतु पहिल्या घोषणेनंतर सहा तालुक्यांना नगर पंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना निघाल्याने पहिले आरक्षण रद्द झाले. त्यानंतर नव्याने जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांची रचना करुन नवे आरक्षण ४ एप्रिल रोजी घोषित करण्यात आले होते. या आरक्षणालाही आक्षेपाचे ग्रहण लागल्याने आता तिसऱ्यांदा २ मे रोजी आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणात वारंवार होत असलेल्या या बदलामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव वरखाली होत आहे. आरक्षण निश्चित न झाल्याने आपले क्षेत्र निवडणे संभाव्य उमेदवारांसाठी कठीण जात आहे. ४ एप्रिल रोजी झालेल्या घोषणेनंतर काही उमेदवारांनी संभाव्य क्षेत्र निवडून त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करणे सुरु केले होते. मात्र आक्षेपामुळे या उमेदवारांचे मनसुबे उधळल्या गेले आहेत. त्यामुळे आता संभाव्य उमेदवारांच्या नजरा २ मे रोजी काढल्या जाणाऱ्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.