शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उपवर्गीकरणाचा निर्णय कायदा करून त्वरित रद्द करा; दलित, आदिवासी, ओबीसी संघटना रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 15:22 IST

Gondia : जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालयांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या 'भारत चंद'ला बुधवारी (दि. २१) जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारने हा निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून कायदा करावा या मागणीसाठी दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या, गोंदिया शहरासह सर्वच तालुक्यांत शाळा, कॉलेजला सुटी देण्यात आली होती. व्यापारी संघटनांनीसुद्धा बंदला समर्थन दिल्याने शहरातील बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती.

सकाळी नऊपासून शहराच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने नागरिक मोटारसायकल रैली, पदयात्रा काढत प्रशासकीय इमारतीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर एकत्र आले. येथे झालेल्या सभेतून सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली. अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या वर्गातही 'क्रिमिलेयर' लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या विरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी बुधवारी 'भारत बंद'ची हाक दिली. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करून त्यांनाही लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीने केली.

भारत बंदमध्ये विविध संघटनांचा समावेशया भारत बंदला भारतरत्न डॉ. बाबासाहेच आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सय समिती, आदिवासी पीपल्स फेडरेशन, मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्ट, ओबीसी संघर्ष कृती समिती, संघर्ष वाहिनी, आर.टी. फाउंडेशन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, चर्मकार महासंघ, संविधान मैत्री संघ, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी, मुस्लीम जमात गोंदिया, ओबीसी अधिकार मंच, ओबीसी सेवा संघ, महात्मा फुले समता परिषद, ओचीसी जनमोर्चा, बहुजन युवा मंच यांच्यासह विविध दलित आणि आदिवासी ओबीसी संघटनांसह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविला.

बंदमुळे एसटीच्या १९४ फेऱ्या रद्दभारत बंदच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील बससेवा ठप्प होती. जिल्ह्यातील २७३ फेऱ्यांपैकी ११४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर दुपार पासून सुरु झालेल्या ७९ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. गोंदिया-ना- गपूर बससेवा सकाळी १० वाजल्यानंतर सुरू करण्यात आली. गोंदिया-आमगाव, आमगाव-देवरी, गोंदिया-बालाघाट या एसटी फेया बंद होत्या. १९४ फेऱ्या गोंदिया आगाराला रद्द कराव्या लागल्या, अशी माहिती वाहतूक नियंत्रक जगन्नाथ बोकळे यांनी दिली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया