शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

आमगावचे रेणुकानगर चार महिन्यांपासून पाण्यात

By admin | Updated: May 2, 2015 01:41 IST

पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे.

आमगाव : पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे. मागील चार महिन्यापासून रबि पिकासाठी दिले जाणारे पाणी शेतीला मिळत नाही. उलट ते पाणी आमगावच्या रेणुकानगर, राजाभोज नगर व न्यायालयाच्या मागील भागात मागील चार महिन्यापासून वाहात आहे.रबी पिकासाठी पाटबंधारे विभागाने मागील चार महिन्यापासून पाणी वाहात आहे. मागील चार महिन्यात कितीतरी पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे या परिसरात घर बांधणाऱ्या लोकांचे सिमेंट खराब झाले. विहीरीतील पाणी खराब झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमगावच्या न्यायालयामागील भाग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे. रेणुकानगरातील लोकांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. या नगरातील रस्ते कच्चे असल्यामुळे उन्हाळ्यातही गुडघाभर पाण्यातून तेथील लोकांना ये-जा करावी लागते. मागील चार महिन्यापासून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाचे कालवे अनेक ठिकाणातून भग्न असल्यामुळे कालव्यातील पाणी शेतीला न मिळता सरळ लोकवस्तीतून वाहात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांना चिखलातून ये-जा करावी लागते. त्रस्त झालेल्या लोकांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून लोकांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. तेथील शाखा अभियंता एफ.पी. राठोड यांना या वाहत्या पाण्याची माहिती दिल्यावर राठोड यांनी त्या नागरिकांश्ी अरेरावी करून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा आम्ही काय करणार असा उलट प्रश्न नागरिकांना केला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पाटबंधारे विभागाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. मागील चार महिन्यापासून पाटबंधारे विभागाच्या उदासिनतेमुळे लाखो रूपयाचे पाणी वाहून गेले आहे. शाखा अभियंत्यांना सांगूनही त्यांनी या प्रकराकडे लक्ष दिले नाही. परिणामी चार महिन्यापासून राजाभोज कॉलनी व रेणुका नगरातील लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाया गेलेल्या पाण्याचा भूर्दंड राठोड यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बोरसरे, डॉ. पाथोडे, जांभूळकर, रामटेके, मेश्राम, लांजेवार व नागवंशी यांनी केली आहे.