शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

रबी लागवडीसाठी धरणांचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बीची पिकांची लागवड केली आहे.यासाठी ओवारा धरणाचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यास मदत होईल.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : खरीप हंगामातील धानपिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी ओवारा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बीची पिकांची लागवड केली आहे.यासाठी ओवारा धरणाचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यास मदत होईल. अशी मागणी कारुटोलाचे उपसरपंच नंदकिशोर चुटे, प्रा. सागर काटेखाये,मनीराम शेंडे, देवेंद्र मुनेश्वर, कमलेश बोपचे, दुर्वेस दोनोडे, माजी सरपंच मिलींद गजभिये, उमेश दोनोडे, भिमा बोहरे, प्रकाश दोनोडे यांनी केली आहे. पाणी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाला. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पाऊस चांगलाच बरसल्याने त्याचा फटका धान पिकांना बसला.शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमावावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमंतीने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. रब्बी पिकांना ओवारा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी मिळल्यास उत्पादन घेण्यास मदत होईल.आ.सहषराम कोरोटे यांनी याकडे लक्ष घालून ओवारा धरणाचे पाणी रब्बी पिकांसाठी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी ओवारा धरणाचे पाणी रोटेशन पद्धतीप्रमाणे वाटप केल्या जाते. मागील दोन वर्षापासून सलंगटोला, हेटीटोला, कारुटोला, कवडी, वळद, साखरीटोला या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी धरणाचे पाणी मिळाले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागले होते. मात्र यंदा ओवारा धरणाचे पाणी न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.रबी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वाढमागीलवर्षी रब्बी २७ हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. तर यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार हजार हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे.ज्वारी आणि जवसाची लागवडजिल्ह्यातील पीक पध्दतीत बदल करण्यासाठी आणि पांरपारिक पीक पध्दतीत बदल करण्यासाठी कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांना रब्बीत ज्वारी आणि जवसाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.यासाठी शेतकऱ्यांना जवस आणि ज्वारीचे बियाणे मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. जवळपास १३०० हेक्टरवर ज्वारी आणि ६०० हेक्टरवर जवसाची लागवड करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती