शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रबी लागवडीसाठी धरणांचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बीची पिकांची लागवड केली आहे.यासाठी ओवारा धरणाचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यास मदत होईल.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : खरीप हंगामातील धानपिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी ओवारा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बीची पिकांची लागवड केली आहे.यासाठी ओवारा धरणाचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यास मदत होईल. अशी मागणी कारुटोलाचे उपसरपंच नंदकिशोर चुटे, प्रा. सागर काटेखाये,मनीराम शेंडे, देवेंद्र मुनेश्वर, कमलेश बोपचे, दुर्वेस दोनोडे, माजी सरपंच मिलींद गजभिये, उमेश दोनोडे, भिमा बोहरे, प्रकाश दोनोडे यांनी केली आहे. पाणी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाला. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पाऊस चांगलाच बरसल्याने त्याचा फटका धान पिकांना बसला.शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमावावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमंतीने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. रब्बी पिकांना ओवारा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी मिळल्यास उत्पादन घेण्यास मदत होईल.आ.सहषराम कोरोटे यांनी याकडे लक्ष घालून ओवारा धरणाचे पाणी रब्बी पिकांसाठी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी ओवारा धरणाचे पाणी रोटेशन पद्धतीप्रमाणे वाटप केल्या जाते. मागील दोन वर्षापासून सलंगटोला, हेटीटोला, कारुटोला, कवडी, वळद, साखरीटोला या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी धरणाचे पाणी मिळाले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागले होते. मात्र यंदा ओवारा धरणाचे पाणी न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.रबी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वाढमागीलवर्षी रब्बी २७ हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. तर यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार हजार हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे.ज्वारी आणि जवसाची लागवडजिल्ह्यातील पीक पध्दतीत बदल करण्यासाठी आणि पांरपारिक पीक पध्दतीत बदल करण्यासाठी कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांना रब्बीत ज्वारी आणि जवसाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.यासाठी शेतकऱ्यांना जवस आणि ज्वारीचे बियाणे मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. जवळपास १३०० हेक्टरवर ज्वारी आणि ६०० हेक्टरवर जवसाची लागवड करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती