शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

सातबारावर महिलांच्या नावाची नोंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 11:36 PM

शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही.

ठळक मुद्देचिरेखनीत संवाद पर्व :तहसीलदार संजय रामटेके यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. शेतीची सहमालक व विविध योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकºयांनो आपल्या कुटूंबातील मुलीचे, सुनेचे आणि पत्नीचे नाव सातबाºयावर नोंदवा, असे आवाहन तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी केले आहे.तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे सार्वजनिक गणेश मंडळ चिरेखनी समाज ग्रामसंस्था व कल्याण ग्रामसंस्था, जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. गटविकास अधिकारी इनामदार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सरपंच जगन्नाथ पारधी, उपसरपंच सोनू पारधी, विस्तार अधिकारी उके, बन्सोड, कृषीमित्र नंदराम पारधी, पाणलोट समतिीचे सचिव लेखराम राणे, माविमच्या तालुका कार्यक्रम समन्वयक शिल्पा येडे, ग्रामसेवक तिडके उपस्थित होते. एक गाव एक गणपती ही संकल्पना चिरेखनी या गावात प्रत्यक्ष साकारली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्र म आयोजित करण्यात येतात.संवाद पर्व हा कार्यक्रम शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केला जात आहे. शेतकºयांनी आता सेंद्रीय शेती करून पिकांचे उत्पादन घ्यावे, सेंद्रीय शेत मालाला चांगला भाव मिळतो, सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यास मदत होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गावातील प्रत्येक कुटूंबातील महिला ही बचतगटात सदस्य आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी पैशाच्या बचतीला सुरुवात तर केली आहेच यापुढेही जावून त्या उद्योग व्यवसायाची कास धरीत असल्याचे सोसे यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वाच्या आयोजनातून ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चंद्रकला बिसेन, उपाध्यक्ष रेघन पारधी, सचिव चंद्रकला कुर्वे, सहसचिव जीवनकला पारधी, कोषाध्यक्ष कल्पना रिनाईत, कल्याण ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष पोर्णिमा शहारे, उपाध्यक्ष स्वानंदा कोटांगले, सचिव निला पारधी, सहसचिव अलका कुर्वे, कोषाध्यक्ष मुनेश्वरी भगत, जोती पटले, वैशाली पारधी, प्रणिता राणे, गीता मडावी यांनी सहकार्य केले.तर शासकीय योजनांचा लाभ नाहीस्वच्छ भारत मिशन कार्यक्र माची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात यावी. गावातील कोणतेही कुटूंब उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जे उघड्यावर शौचास जातील त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे इनामदार यांनी सांगितले.