शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीमधून आशेचा किरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST

बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा ...

बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमिनीची सुपीकता खालावली आहे. विविध रासायनिक खते व कीटकनाशके औषधांच्या सततच्या वापरामुळे शेतीची सुपीकता कमी झाली. जमिनीची भूक भागवून सुपीकता कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी एक आशेच्या किरणासह वरदान असल्याचे प्रतिपादन नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी केले.

तालुक्यातील आसोली येथे आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षणात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शाश्वत शेती अभियान २०२०-२१ जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत आसोली येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यादवराव मसराम, ललीत सोनवाने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, कृषी पर्यवेक्षक नरेश बोरकर, दुधराम नाकाडे, भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र राऊत म्हणाले, सेंद्रिय खत, शेण खत, जैविक, हिरवळी खत, जोर खते वापरूनच जमिनीचे आरोग्य पूर्ववत करू शकतो. जमिनीचे आरोग्य सांभाळणे काळाजी गरज आहे. रासायनिक खतांचा वापर सुरू राहिला तर जमिनीची सुपीकता मृतप्राय झाल्याशिवाय राहणार नाही. ललीत सोनवाणे म्हणाले, फळबाग, अद्रक, प्लास्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. भाताची शेती आजघडीला तोट्याची झाली आहे. पाण्याची उपलब्धता असूनसुद्धा केवळ भातपिकाचेच उत्पादन घेतले जाते. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. ऊस, केळी, मका, भाजीपाला या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करून घर संसारास हातभार लावण्यासाठी पुढे यावे. मंडळ कृषी अधिकारी वरकडे यांनी शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य होणार नाही, असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वनाथ कवासे, चिंतामण मसराम, रजनिश मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनीसुद्धा शेतीविषयक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे संचालन पंकज सूर्यवंशी यांनी केले तर आभार भारती येणे यांनी मानले.