शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

सेंद्रिय शेतीमधून आशेचा किरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST

बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा ...

बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमिनीची सुपीकता खालावली आहे. विविध रासायनिक खते व कीटकनाशके औषधांच्या सततच्या वापरामुळे शेतीची सुपीकता कमी झाली. जमिनीची भूक भागवून सुपीकता कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी एक आशेच्या किरणासह वरदान असल्याचे प्रतिपादन नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी केले.

तालुक्यातील आसोली येथे आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षणात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शाश्वत शेती अभियान २०२०-२१ जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत आसोली येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यादवराव मसराम, ललीत सोनवाने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, कृषी पर्यवेक्षक नरेश बोरकर, दुधराम नाकाडे, भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र राऊत म्हणाले, सेंद्रिय खत, शेण खत, जैविक, हिरवळी खत, जोर खते वापरूनच जमिनीचे आरोग्य पूर्ववत करू शकतो. जमिनीचे आरोग्य सांभाळणे काळाजी गरज आहे. रासायनिक खतांचा वापर सुरू राहिला तर जमिनीची सुपीकता मृतप्राय झाल्याशिवाय राहणार नाही. ललीत सोनवाणे म्हणाले, फळबाग, अद्रक, प्लास्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. भाताची शेती आजघडीला तोट्याची झाली आहे. पाण्याची उपलब्धता असूनसुद्धा केवळ भातपिकाचेच उत्पादन घेतले जाते. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. ऊस, केळी, मका, भाजीपाला या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करून घर संसारास हातभार लावण्यासाठी पुढे यावे. मंडळ कृषी अधिकारी वरकडे यांनी शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य होणार नाही, असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वनाथ कवासे, चिंतामण मसराम, रजनिश मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनीसुद्धा शेतीविषयक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे संचालन पंकज सूर्यवंशी यांनी केले तर आभार भारती येणे यांनी मानले.