शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

२३ गावांतील शिधापत्रिकाधारक 'आनंदाचा शिधा'ला मुकले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 12:09 IST

कंत्राटदाराचे नियोजन ढासळले : कुठे मैदा तर कुठे पोहे पोहोचलेच नाही

विजेंद्र मेश्राम

खातिया (गोंदिया) : शासनाच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी आनंदाचा शिधा राज्य शासनाच्या वतीने देण्यात येते. १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधात साखर, तेल, पोहे, रवा, मैदा, दाळ दिले जात आहे. पण, गोंदिया तालुक्यातील खातियासह २३ गावांतील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे या २३ गावांतील नागरिक दिवाळीत गोडधोड तयार करुन दिवाळी आनंदात साजरी करण्यास मुकणार आहेत.

शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याचे नियोजन महिनाभरापूर्वीच करण्यात आले होते. दिवाळीपूर्वी काही स्वस्त धान्य दुकानांना शिधा पोहोचविण्यात आला. तर काही ठिकाणी अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांत निराशेचे वातावरण आहे. गोंदिया तालुक्यातील २३ गावांतील नागरिक आनंदाचा शिधाला मुकले आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.

कुठे मैदा तर कुठे पोहे कमी

आंनदाचा शिधा किटमध्ये कुठे मैदा तर कुठे पोहे मिळाले नाही. तर गोंदिया तालुक्यातील २३ गावांमध्ये आनंदाचा शिधाची किट पोहोचली नाही. पोहे व मैदा आला नाही. यासंदर्भात या किटचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना पुरवठा विभागाने कळविले होते. पण, यानंतरही त्यांनी पुरवठा केला नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

- एच.डी.नाईक, पुरवठा निरीक्षक, गोंदिया.

इंटरनेटचा बसतोय फटका

स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारक गेले असता त्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांना तासन् तास बसून राहावे लागत आहे. परिणामी इंटरनेट बंदचा सुध्दा शिधापत्रिकाधारकांना फटका बसत आहे.

टॅग्स :Governmentसरकारgondiya-acगोंदिया