शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

पोवारीटोला येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:13 IST

आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ठळक मुद्देनळ योजनेचा अभाव : नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे येथील संप्तत नागरिकांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करुन तहसीलदार डी.एस.भोयर यांना निवेदन दिले.आमगाव देवरी मुख्यमार्गावर असलेल्या पोवारीटोला येथील नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. येथील नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. पण अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आलीे नाही. परिणामी येथील नागरिकांना पाण्यासाठी पायापीट करावी लागत आहे.पोवारीटोलासह पाणी टंचाईची झळ आमगाव रिसामा, किडंगीपार, बिरसी, बनगाव, कुंभारटोली, माल्ही व पदमपूर या गावांना सुध्दा बसत आहे. आमगाव वळगता उर्विरत गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र आमगाव शहराची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीत दररोज लागणाºया पाण्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात पाणीे पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला दररोज चार लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण, पाण्याची साठवण क्षमता केवळ २ लाख २५ हजार लिटरची आहे. त्यामुळेच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल सुध्दा कोरडया पडल्या आहेत. ज्या विहिरींना पाणी आहे. त्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्यात यावी. यासाठी सिंधू देशकर, सोमेश्वरी रहांगडाले, शुभांगी रहांगडाले, युवराज रंगारी, राजकुमार देशकर आणि इतर नागरिकांनी नगर परिषदेचे प्रशासक डी.एस.भोयर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ही समस्या मार्गी न लागल्यास याविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई