शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पोवारीटोला येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:13 IST

आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ठळक मुद्देनळ योजनेचा अभाव : नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे येथील संप्तत नागरिकांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करुन तहसीलदार डी.एस.भोयर यांना निवेदन दिले.आमगाव देवरी मुख्यमार्गावर असलेल्या पोवारीटोला येथील नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. येथील नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. पण अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आलीे नाही. परिणामी येथील नागरिकांना पाण्यासाठी पायापीट करावी लागत आहे.पोवारीटोलासह पाणी टंचाईची झळ आमगाव रिसामा, किडंगीपार, बिरसी, बनगाव, कुंभारटोली, माल्ही व पदमपूर या गावांना सुध्दा बसत आहे. आमगाव वळगता उर्विरत गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र आमगाव शहराची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीत दररोज लागणाºया पाण्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात पाणीे पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला दररोज चार लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण, पाण्याची साठवण क्षमता केवळ २ लाख २५ हजार लिटरची आहे. त्यामुळेच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल सुध्दा कोरडया पडल्या आहेत. ज्या विहिरींना पाणी आहे. त्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्यात यावी. यासाठी सिंधू देशकर, सोमेश्वरी रहांगडाले, शुभांगी रहांगडाले, युवराज रंगारी, राजकुमार देशकर आणि इतर नागरिकांनी नगर परिषदेचे प्रशासक डी.एस.भोयर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ही समस्या मार्गी न लागल्यास याविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई