शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

योग्य मोबदला दिल्यावरच टॉवर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:14 IST

तालुक्यातील ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी रेल्वे टॉवर तयार करण्याकरिता ताब्यात घेतली. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न देता रेल्वेचे अधिकारी पोलिसांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) टॉवर उभारण्यासाठी आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : रेल्वेच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी रेल्वे टॉवर तयार करण्याकरिता ताब्यात घेतली. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न देता रेल्वेचे अधिकारी पोलिसांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) टॉवर उभारण्यासाठी आले. यावर मात्र शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला द्या तेव्हाच टॉवर उभार देऊ असा पवित्रा घेतल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले.रेल्वे विभागाने तीन वर्षांपूर्वी ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची जमीन टॉवर उभारण्यासाठी ताब्यात घेतली होती. मात्र रेल्वेकडून फक्त ३५ हजार रु पयांचे धनादेश शेतकऱ्यांना देत योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केली. तसेच शुक्रवारी (दि.२६) चिचगाव येथे टॉवर उभारण्यासाठी पोलीस ताफ्यासह दाखल झाले.शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आपल्या मागण्या रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत टॉवरचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेत टॉवर बांधकामाचे काम थांबविले.तसेच ७ दिवसांत योग्य मोबदला द्या तेव्हाच टॉवरचे बांधकाम करू देऊ असा इशारा चिचगावचे शेतकरी राजू रहांगडाले, गजेंद्र रहांगडाले, भिकाजी ठाकरे, पूरगावचे शेतकरी प्रल्हाद हरिणखेडे, दिगेंद्र रहांगडाले यांना दिला. यावेळी डी. एम. चाचेरे, सिंग, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, जितेंद्र कटरे, संजय टेंभरे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरी