शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:18 IST

रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देप्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ : घरांची पडझड, रोवण्यांना संजीवनी, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी (दि.२७) जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची तर जिल्ह्यात सरासरी २६.४८ मि.मी.पावसाची नोंद झाली.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली असून रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात आठ ते दहा घरांची पडझड झाली.त्यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागले.पावसाचा जोर कायम असला तरी जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अद्यापही तूट कायम आहे. यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाल्याने रोवणीची कामे लांबली होती. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीला रोवणीच्या कामाला वेग आला. रोवणी केल्यानंतर आठ दहा दिवसांच्या कालावधीत पावसाची गरज असते.यामुळे पिकांची चांगली वाढ होते.जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या धान पिकांना संजीवनी मिळाली.त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तर सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांवर पाणीसाठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती