शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

जिल्ह्यात पंधरा दिवसांनंतर बरसल्या पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते.

ठळक मुद्देरोवणीच्या कामाला येणार गती : बळीराजा सुखावला, रस्त्यांवर साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे तलाव, बोड्या, नदीनाले सर्वच कोरेडे पडले होते. तर पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवण्यादेखील खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२३) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचले होते. तर शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट काही प्रमाणात दूर झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी केवळ २५ टक्केच रोवण्या झाल्या होत्या. तर तलाव, बोड्या, नदीनाले सुध्दा कोरडे पडले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तर पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पावसाअभावी उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयसुध्दा त्रस्त झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची बॅटिंग सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच होती. त्यामुळे शेतातील बांध्यामध्येसुध्दा पाणी साचल्याचे तर नालेसुध्दा दुथडी भरून वाहत असल्याचे दिलासादायक चित्र होते. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.

दोन तालुक्यात अतिवृष्टीजिल्ह्यात गेल्या २४ तासात ४७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर तिरोडा आणि गाेरेगाव तालुक्यात ६५ मि.मी. वर पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र होते.

पावसाची तूट कायमजिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते २३ जुलै या कालावधीत ५००.६ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा याच कालावधीत ४४९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ८९. ८ टक्के आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस