शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

जिल्ह्यात पंधरा दिवसांनंतर बरसल्या पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते.

ठळक मुद्देरोवणीच्या कामाला येणार गती : बळीराजा सुखावला, रस्त्यांवर साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे तलाव, बोड्या, नदीनाले सर्वच कोरेडे पडले होते. तर पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवण्यादेखील खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२३) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचले होते. तर शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट काही प्रमाणात दूर झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी केवळ २५ टक्केच रोवण्या झाल्या होत्या. तर तलाव, बोड्या, नदीनाले सुध्दा कोरडे पडले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तर पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पावसाअभावी उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयसुध्दा त्रस्त झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची बॅटिंग सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच होती. त्यामुळे शेतातील बांध्यामध्येसुध्दा पाणी साचल्याचे तर नालेसुध्दा दुथडी भरून वाहत असल्याचे दिलासादायक चित्र होते. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.

दोन तालुक्यात अतिवृष्टीजिल्ह्यात गेल्या २४ तासात ४७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर तिरोडा आणि गाेरेगाव तालुक्यात ६५ मि.मी. वर पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र होते.

पावसाची तूट कायमजिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते २३ जुलै या कालावधीत ५००.६ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा याच कालावधीत ४४९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ८९. ८ टक्के आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस