शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, एस.टी ‘हाऊसफुल’

By admin | Updated: October 26, 2014 22:41 IST

दिवाळी हा आनंदाचा उत्सव. बाहेरगावी नोकरी करणारे लोक या उत्सवासाठी घरी ़जातात. सध्या दिवाळी संपली आहे. सुट्या सुरू झाल्या असून अनेकांना आपापल्या ठिकाणी येण्या-जाण्याचे वेध लागले आहे.

प्रवाशांची गैरसोय : उसळलेल्या गर्दीमुळे आरक्षण नाहीचगोंदिया : दिवाळी हा आनंदाचा उत्सव. बाहेरगावी नोकरी करणारे लोक या उत्सवासाठी घरी ़जातात. सध्या दिवाळी संपली आहे. सुट्या सुरू झाल्या असून अनेकांना आपापल्या ठिकाणी येण्या-जाण्याचे वेध लागले आहे. कित्येकांनी प्रवासाचे बुकिंग करून ठेवले आहे. त्यामुळे रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तब्बल महिनाभर आरक्षण नसल्याचे चित्र आहे. दिवाळी आपापल्या कुटुंबीयासमवेत साजरी करण्यासाठी बाहेरगावी नोकरी, व्यवसाय किंवा खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले आपल्या गावाकडे परत गेले होते. आता दिवाळीचा आनंद घेऊन ते परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन दिवाळीपूर्वीच केले जाते. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वे व बसस्थानकावर एकच गर्दी उसळली आहे. खासगी बसचे प्रवासदर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे रेल्वेचे बुकिंंग हाऊसफुल झाले असून वेटिंगचेही वांदे आहे. गोंदियावरून नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. गत आठवड्यापासून एसटीने व्यवसायात उचल खाल्ली आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता नागपूरकडे जाण्यासाठी एसटीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा खासगी बसचे दर तिप्पट आहेत. प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे खासगी बसवाले हे पैसे लुटत असल्याचा सूर प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. खासगी बसगाड्या प्रशस्त व निमआरामाच्या असल्यामुळे बहुतांश प्रवासी एसटीने प्रवास करणे टाळत आहेत. अनेक खासगी बसगाड्यांच्या थांब्यावर प्रवाशांची झुंबड पहावयास मिळाली. दिवाळीसाठी लोकांचा प्रवास गेल्या आठ दिवसांपासून सुरू झाला असून तीन दिवसांत प्रवाशांची गर्दी कमालीची दिसत आहे. त्यामुळे एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले आहे. एसटीच्या तुलनेत रेल्वे आरक्षणसुद्धा महिनाभर हाऊसफुल आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, हावडा, चैन्नई आदी महत्त्वपूर्ण शहरांकडे जाण्यासाठी आरक्षण मिळेनासे आहे. अनेकांनी दिवाळीला येण्यापूर्वीच परतण्याचे सुद्धा रेल्वे आरक्षण केले आहे. मात्र वेळेवर आरक्षण करणाऱ्यांची गोची झाली असून घराकडे परतणे आवश्यक असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जाणे पसंत करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)