शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पाण्याअभावी रब्बीतील धान करपले; शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:45 IST

मोहगाव तिल्ली परिसरात गंभीर स्थिती : काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला

दिलीप चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान करपले तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी धानाचे नुकसान होत असल्याचे पाहून हिरवा धान कापणी करून संताप व्यक्त केला. हा प्रकार तालुक्यातील मोहगाव तिल्ली परिसरात गुरुवारी (दि. २०) घडला.

जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गोरेगाव तालुक्यातही रब्बी धानाची १० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील रोवणी आटोपली असून, धानाला पाण्याची गरज आहे. रब्बीसाठी जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कृषिपंपाद्वारे पाणी करून पीक घेतात. पण कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यात कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, तर कधी कमी विद्युत दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीला सिंचन करणे कठीण या समस्येने या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद गोपीचंद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात लावलेला धान गर्भावस्थेत असताना पाण्याअभावी करपत असल्याचे पाहून कापणी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पुढे आला आहे, तर पटले यांच्या प्रमाणेच इतरही शेतकऱ्यांची स्थिती आहे. मोटारपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने अनेक शेतकरी चिंतातुर असून, त्यांच्यावर हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.

महावितरण विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्तमोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात धानाची रोवणी केली होती. मात्र तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली दोन ट्रान्सफॉर्मर १५ दिवसांपूर्वी जळाल्याने रब्बी हंगामात लावलेल्या धान पिकाला पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे शेतकरी विनोद पटले यांच्यावर हिरवा धान कापण्याची नामुष्की आली. मोहगाव तिल्ली येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला.

पंधरा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती नाहीपंधरा दिवसांपूर्वी तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली येथील एक रोहीत्र जळाले आहे. या संदर्भात बऱ्याचदा शेतकऱ्यांनी तेढा उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर धान पाण्याअभावी करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोटारपंपांना अखंडित वीजपुरवठा कधीशेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषिपंपाला अखंडित आठ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी त्यांना आश्वासन देत आहेत. पण अद्यापही चार तास विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना विजेच्या समस्येमुळे तोंडचा घास हिरावण्याची चिंता सतावत आहे.

दोन दिवसात समस्या मार्गी लावामोहगाव तिल्ली येथील रोहीत्र जळून पंधरा दिवस झाले पण अद्यापही त्याची दुरुस्ती केली नाही. याचा या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दोन दिवसात ही समस्या मार्गी लावण्याची मार्गी आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया