शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

३६ हजार हेक्टरने घटणार रब्बीचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:29 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर सुध्दा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देकमी पावसाचा फटका : कृषी विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर सुध्दा परिणाम होणार आहे. कमी पावसामुळे रब्बीचे लागवड क्षेत्र ३६ हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कृषी विभागाने ७६ हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन केले होते. मात्र कमी पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला मोजकाच पाणीसाठा यामुळे आता केवळ ४० हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या क्षेत्रात सुध्दा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात जून ते सप्टेबर दरम्यान सरासरी ११५० मिमी. पेक्षा अधिक पाऊस होतो. त्यामुळे खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकरी उपलब्ध सिंचनाच्या सोयींच्या मदतीने रब्बी पिकांची लागवड करतात. दरवर्षी तब्बल ७६ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जात होती. मात्र यंदा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यातच पिकांवरील कीडरोगांमुळे शेतकरी हैराण झाले आहे. जिल्ह्यातील लहान, मोठ्या, मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे.यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मिळणार की नाही याची शाश्वती शेतकºयांना नाही. कारण आता रब्बीसाठी पाणी दिल्यास पुढे जाऊन पिण्यासाठी पाणी उरणार नाही. अशात जिल्हावासीयांची पाण्यासाठी भटकंती होणार. त्यामुळे आतापासून जिल्हा प्रशासनाकडून पाणी वाचवाचा नारा दिला जात आहे.म्हणजेच, रब्बीसाठी पाणी दिल्यास जिल्हावासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार यात शंका दिसत नाही. अशात शेती पेक्षा पिण्यासाठी जास्त गरज असल्याने रब्बीसाठी पाणी नाहीच असा फॉमुर्ला अवलंबीला जाणार असल्याचे दिसते. त्यामुळे रब्बी पिकांची लागवड न करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतल्याचे चित्र आहे.धानाचा कटोरा होणार रिताजिल्ह्याची धानाचा कटोरा म्हणून दूरवर ख्याती आहे. मात्र जिल्ह्याला मिळालेली ही उपमा निसर्गाच्या पचनी पडत नाही असेच काहीसे वाटत आहे. कारण, मागील कित्येक वर्षांपासून कधी अत्याधिक पाऊस पिकांचे नुकसान करीत आहे. तर कधी अल्प पावसामुळे पीक दम तोडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील धानाचे उत्पन्न घटत चालले आहे. यंदा खरिपात पाणी व रोगराईने उत्पन्नावर मात केली. त्यात आता रब्बी वांद्यात असल्याने धानाची घट होणार. एकंदर धानाचा कटोरा हळहळू रिकामा होत चालला आहे.