शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

३६ हजार हेक्टरने घटणार रब्बीचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:29 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर सुध्दा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देकमी पावसाचा फटका : कृषी विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर सुध्दा परिणाम होणार आहे. कमी पावसामुळे रब्बीचे लागवड क्षेत्र ३६ हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कृषी विभागाने ७६ हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन केले होते. मात्र कमी पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला मोजकाच पाणीसाठा यामुळे आता केवळ ४० हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या क्षेत्रात सुध्दा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात जून ते सप्टेबर दरम्यान सरासरी ११५० मिमी. पेक्षा अधिक पाऊस होतो. त्यामुळे खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकरी उपलब्ध सिंचनाच्या सोयींच्या मदतीने रब्बी पिकांची लागवड करतात. दरवर्षी तब्बल ७६ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जात होती. मात्र यंदा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यातच पिकांवरील कीडरोगांमुळे शेतकरी हैराण झाले आहे. जिल्ह्यातील लहान, मोठ्या, मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे.यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मिळणार की नाही याची शाश्वती शेतकºयांना नाही. कारण आता रब्बीसाठी पाणी दिल्यास पुढे जाऊन पिण्यासाठी पाणी उरणार नाही. अशात जिल्हावासीयांची पाण्यासाठी भटकंती होणार. त्यामुळे आतापासून जिल्हा प्रशासनाकडून पाणी वाचवाचा नारा दिला जात आहे.म्हणजेच, रब्बीसाठी पाणी दिल्यास जिल्हावासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार यात शंका दिसत नाही. अशात शेती पेक्षा पिण्यासाठी जास्त गरज असल्याने रब्बीसाठी पाणी नाहीच असा फॉमुर्ला अवलंबीला जाणार असल्याचे दिसते. त्यामुळे रब्बी पिकांची लागवड न करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतल्याचे चित्र आहे.धानाचा कटोरा होणार रिताजिल्ह्याची धानाचा कटोरा म्हणून दूरवर ख्याती आहे. मात्र जिल्ह्याला मिळालेली ही उपमा निसर्गाच्या पचनी पडत नाही असेच काहीसे वाटत आहे. कारण, मागील कित्येक वर्षांपासून कधी अत्याधिक पाऊस पिकांचे नुकसान करीत आहे. तर कधी अल्प पावसामुळे पीक दम तोडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील धानाचे उत्पन्न घटत चालले आहे. यंदा खरिपात पाणी व रोगराईने उत्पन्नावर मात केली. त्यात आता रब्बी वांद्यात असल्याने धानाची घट होणार. एकंदर धानाचा कटोरा हळहळू रिकामा होत चालला आहे.