शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या व्यंगत्वावर मात करण्यासाठी ‘शीघ्र हस्तक्षेप केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांना उभ्या आयुष्यात जगतांना अडचण येऊ नये, कुणी हिनवू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण यशस्वी उपचारासाठी शासनाने ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ उभारले आहे.

ठळक मुद्दे१११५ बालकांवर यशस्वी उपचार। सात महिन्यांपासून दिली जाताहे सेवा

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जन्मत:च व्यंगत्व किंवा जन्मानंतर शरीरात आलेल्या व्याधींवर मात करण्यासाठी शासनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात‘जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ सुरू केले आहे. एप्रिल २०१९ पासून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या शिघ्र हस्तक्षेप केंद्राचा लाभ १ हजार ११५ बालकांना झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्या बालकांवर उपचार केला जात आहे.आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांना उभ्या आयुष्यात जगतांना अडचण येऊ नये, कुणी हिनवू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण यशस्वी उपचारासाठी शासनाने ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ उभारले आहे. ह्या केंद्राच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील व्यंगत्व असलेले किंवा जीवन जगत असतांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्राची मदत मिळत आहे.एप्रिल २०१९ पासून सुरू झालेल्या या केंद्रामार्फत गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ११५ बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आला. ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना जन्मत: असणारे आजार, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, बालपणातील आजार, शारीरिक व बौध्दीक विकासात्मक वाढीतील होणारे आजार यांच्यावर विनामुल्य तपासण्या व त्यांचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येते.जीवनसत्वाच्या अभावामुळे उदभवणारे रक्तक्षय अ‍ॅनिमिया, रातांधळेपणा, कुपोषण व मुडदूस अशा आजारांचे उपचार केले जाते. या केंद्रात बालकांवर उपचार करण्यासाठी किंवा त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी बालरोग विशेषतज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर, वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कृष्णकुमार त्रिपाठी, व्यवस्थापक म्हणून पारस लोणारे व त्यांच्या मदतीला काही डॉक्टर व कर्मचारी आहेत.बालपणातील आजार,शारीरीक व बौध्दीक विकासात्मक वाढीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी डीईआयसी कार्यक्रम घेण्यात येत आहे.या आजारांवर होणार उपचारजन्मत:च असणाऱ्या व्यंगत्व यात न्युरल ट्यूब डिफेक्ट, डाऊन सिन्ड्रोम, फाटलेले ओठ, टाळू, वाकडे पाय, डेव्हलपमेंट डिसप्लाझीया ऑफ हिप, जन्मत:च असणारा मोतिया बिंदु, जन्मत: असणारा बहिरेपणा, जन्मत:च असणारा हृदयरोग, रेटावनोपॅथी ऑफ प्रिमेच्युरिटी, जन्मत: असणारा तिरळेपणा, त्वचेचे आजार, कान फुटने, हृदयाचे आजार, श्वसनाचे आजार, दात किडणे, झटके येणे, हायपोथाईरॉडीझम, सिकलसेल अ‍ॅनिमीया, बिटा थॅलेसिमीया, रक्तक्षय अ‍ॅनिमिया, रातांधळेपणा, कुपोषण व मुडदूस अशा आजारांचे उपचार केले जाते.

टॅग्स :Healthआरोग्य