शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

किराणाच्या यादीतून डाळी ‘आऊट’

By admin | Updated: February 22, 2015 01:31 IST

‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, ...

गोंदिया : ‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, डाळींच्या चढत्या किमतीमुळे डाळ खरेदी करणे आजसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गुरूवारचे (दि.१९) भाव बघितल्यास डाळ ९० रूपये किले दराने विक्री झाली. हेच कारण आहे की, किरानाच्या यादीतून डाळी आऊट होत आहेत. जेवणाचा परिपूर्ण मेन्यू म्हटला की, डोळ््यापुढे वरण, भात भाजी व पोळी असलेले ताट येते. यात वरणाचा पहिला क्रमांक असतो. आजघडीला मात्र वाढत्या महागाईमुळे जेवणात पहिल्या क्रमांकावर असलेले हे वरण ताटातून गायब होत आहे. डाळींचे गगनाला भिडत चाललेले भाव यास कारणीभूत असून महागड्या डाळी खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य माणूस धजावत नसल्याचे दिसून येते. परिणामी जेवणाच्या ताटातून वरण गायब होत आहे. गुरूवारी (दि.१९) भाव बघितल्यास, ठोक बाजारात डाळ आठ हजार ३०० ते आठ हजार ४०० रूपये प्रति क्विटल पर्यंत होती. तर चिल्लर बाजारात ९० रूपये प्रतिकिलो दराने विकल्या गेली. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात थोक बाजारात ७५-७६ रूपये प्रति किलो विकल्या गेलेल्या बेस्ट फटका तुर डाळीच्या भावात वाढ झाली आहे. मिडीयम क्वालिटी तुरीच्या डाळीतही जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. गुरूवारी ही डाळ सात हजार ६०० ते सात हजार ८०० रूपये क्विंटल विकल्या गेली. विशेष म्हणजे भाववाढीचे हे परिणाम चना, उडीज, बरबटीच्या डाळीवरही जाणवले. (शहर प्रतिनिधी)