शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:25 IST

मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यावर पावसाची मेहरबानी : लघु, मध्यम प्रकल्प व तलावही फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत. अशात येत्या दिवसांत आणखी पाऊस बरसल्यास उरलेले प्रकल्प व तलावही भरणार यात शंका दिसत नाही.मागील वर्षी पावसाने नाराजी दाखविली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत ठणठणाट होता. यंदाही पाऊस दगा तर देणार नाही ना अशी भिती होती. मात्र हवामान खात्याने यंदा वर्तविलेला अंदाजही खरा ठरला व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांत भरभरून पाणीसाठा आहे. यात इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६६.२८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ६३.७८ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ९५.५९ टक्के तर कालीसराड प्रकल्पात ९४.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.या चार मुख्य प्रकल्पांची ही स्थिती असतानाच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर व कटंगी हे पाच प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर चुलबंद प्रकल्पात ६९.८२ टक्के, खैरबंधा प्रकल्पात ९०.०५ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ९८.८२ टक्के पाणासाठा आहे. तसेच २२ लघु प्रकल्पांतील डोंगरगाव, गुमडोह, कालीमाती, मोगरा, पिपरीया, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी व बेवारटोला हे १० प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर आक्टीटोला प्रकल्पात ८८.८५ टक्के, हरी ९२.२१, रेहाडी ८२.२३, सडेपार ७६.३५, सेरपार ७१.२७, वडेगाव ९३.९३, उमरझरी ९५.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रकारे, जिल्ह्यातील ३८ मालगुजारी तलावांतील भानपूर, चान्नाबाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, काटी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा, पळसगाव सौं, पालडोंगरी, पळसगाव डव्वा, पुतळी, सौंदड, तेढा या २० तलावांत १०० टक्के भरलेले आहेत. शिवाय उर्वरीत तलावांतील बहुतांश तलाव ५० टक्केच्यावर भरलेले आहेत.यंदा रबीचा हंगाम होणारमागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे प्रकल्पांत पाणीसाठा नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रब्बीसाठी पाणी न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्यानंतर रबीचा हंगामही शेतकऱ्यांना घेता आला नव्हता. यंदा मात्र चांगला पाऊस झाला असून आता उर्वरीत काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार असे बोलता येईल. असे झाल्यास रबीचा मार्ग मोक ळा होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Waterपाणी