शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:25 IST

मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यावर पावसाची मेहरबानी : लघु, मध्यम प्रकल्प व तलावही फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत. अशात येत्या दिवसांत आणखी पाऊस बरसल्यास उरलेले प्रकल्प व तलावही भरणार यात शंका दिसत नाही.मागील वर्षी पावसाने नाराजी दाखविली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत ठणठणाट होता. यंदाही पाऊस दगा तर देणार नाही ना अशी भिती होती. मात्र हवामान खात्याने यंदा वर्तविलेला अंदाजही खरा ठरला व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांत भरभरून पाणीसाठा आहे. यात इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६६.२८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ६३.७८ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ९५.५९ टक्के तर कालीसराड प्रकल्पात ९४.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.या चार मुख्य प्रकल्पांची ही स्थिती असतानाच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर व कटंगी हे पाच प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर चुलबंद प्रकल्पात ६९.८२ टक्के, खैरबंधा प्रकल्पात ९०.०५ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ९८.८२ टक्के पाणासाठा आहे. तसेच २२ लघु प्रकल्पांतील डोंगरगाव, गुमडोह, कालीमाती, मोगरा, पिपरीया, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी व बेवारटोला हे १० प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर आक्टीटोला प्रकल्पात ८८.८५ टक्के, हरी ९२.२१, रेहाडी ८२.२३, सडेपार ७६.३५, सेरपार ७१.२७, वडेगाव ९३.९३, उमरझरी ९५.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रकारे, जिल्ह्यातील ३८ मालगुजारी तलावांतील भानपूर, चान्नाबाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, काटी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा, पळसगाव सौं, पालडोंगरी, पळसगाव डव्वा, पुतळी, सौंदड, तेढा या २० तलावांत १०० टक्के भरलेले आहेत. शिवाय उर्वरीत तलावांतील बहुतांश तलाव ५० टक्केच्यावर भरलेले आहेत.यंदा रबीचा हंगाम होणारमागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे प्रकल्पांत पाणीसाठा नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रब्बीसाठी पाणी न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्यानंतर रबीचा हंगामही शेतकऱ्यांना घेता आला नव्हता. यंदा मात्र चांगला पाऊस झाला असून आता उर्वरीत काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार असे बोलता येईल. असे झाल्यास रबीचा मार्ग मोक ळा होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Waterपाणी