शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

वन व कृषी पर्यटन विकासाला प्राधान्य

By admin | Updated: August 3, 2014 00:09 IST

गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी

उपमुख्यमंत्र्यांची सूचना : जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्च करागोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अनिल देशमुख, आ.डॉ. खुशाल बोपचे, आ. राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते.समृद्ध वनपरंपरा लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव अभयारण्य असून या ठिकाणी दरवर्षी ४३ हजार पर्यटक भेट देतात. या अभयारण्याचा विकास करण्यासाठी व कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असून यावर्षी पर्यटन विकास महामंडळाची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. कृषी पर्यटनाला जिल्हा सहकारी बँकेने निधी देण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने कृषी पर्यटन विकसित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता पाहता जिल्हा नियोजनमध्ये प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सर्वसाधारण, योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी या योजनामिळून सन २०१४-१५ साठी १८३ कोटी ८३ लाख ९४ हजार ऐवढी अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापैकी ९१ कोटी १ लाख २३ हजार निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो वेळेत खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले.जिल्ह्यातील खरीपचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ४४ हजार ३८० मेट्रीक टन बियाणाचा पुरवठा असून ३४ हजार २२ क्विंटल बियाणे वितरीत करण्यात आले. १० हजार ३५८ क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. तर जिल्ह्यासाठी ४५ हजार १९४ मेट्रिक टन खताचा कोटा असून त्यापैकी २४ हजार २१० मेट्रीक टन खत शिल्लक आहे.जिल्ह्यात ४४ हजार ३७० शेतकरी कृषी कर्ज खातेधारक असून ४२ हजार ११ शेतकऱ्यांना खरीप व रबीचे कृषी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५ हजार ९६९ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला असून त्यासाठी १ कोटी १७ लाख ८ हजार प्रिमियम भरले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी दिली.माजी मालगुजारी तलाव, तेंदूपत्ता व्यवसाय, औद्योगिक संस्था, महाविद्यालय, सिंचन, पर्यटन, जिल्ह्यातील पावसाची स्थिती, मानव विकास मिशन आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यात ९ हजार वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले असून पट्टेधारकांना रबी पिक घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावांचे सक्षमीकरण करुन मत्स्व्यवसायास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. धानउत्पादक शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोदाम उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी घाटे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)