शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन व कृषी पर्यटन विकासाला प्राधान्य

By admin | Updated: August 3, 2014 00:09 IST

गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी

उपमुख्यमंत्र्यांची सूचना : जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्च करागोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अनिल देशमुख, आ.डॉ. खुशाल बोपचे, आ. राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते.समृद्ध वनपरंपरा लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव अभयारण्य असून या ठिकाणी दरवर्षी ४३ हजार पर्यटक भेट देतात. या अभयारण्याचा विकास करण्यासाठी व कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असून यावर्षी पर्यटन विकास महामंडळाची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. कृषी पर्यटनाला जिल्हा सहकारी बँकेने निधी देण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने कृषी पर्यटन विकसित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता पाहता जिल्हा नियोजनमध्ये प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सर्वसाधारण, योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी या योजनामिळून सन २०१४-१५ साठी १८३ कोटी ८३ लाख ९४ हजार ऐवढी अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापैकी ९१ कोटी १ लाख २३ हजार निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो वेळेत खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले.जिल्ह्यातील खरीपचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ४४ हजार ३८० मेट्रीक टन बियाणाचा पुरवठा असून ३४ हजार २२ क्विंटल बियाणे वितरीत करण्यात आले. १० हजार ३५८ क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. तर जिल्ह्यासाठी ४५ हजार १९४ मेट्रिक टन खताचा कोटा असून त्यापैकी २४ हजार २१० मेट्रीक टन खत शिल्लक आहे.जिल्ह्यात ४४ हजार ३७० शेतकरी कृषी कर्ज खातेधारक असून ४२ हजार ११ शेतकऱ्यांना खरीप व रबीचे कृषी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५ हजार ९६९ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला असून त्यासाठी १ कोटी १७ लाख ८ हजार प्रिमियम भरले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी दिली.माजी मालगुजारी तलाव, तेंदूपत्ता व्यवसाय, औद्योगिक संस्था, महाविद्यालय, सिंचन, पर्यटन, जिल्ह्यातील पावसाची स्थिती, मानव विकास मिशन आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यात ९ हजार वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले असून पट्टेधारकांना रबी पिक घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावांचे सक्षमीकरण करुन मत्स्व्यवसायास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. धानउत्पादक शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोदाम उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी घाटे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)