शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

जलयुक्त शिवार अभियानाचे सादरीकरण

By admin | Updated: February 12, 2015 01:22 IST

टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

गोंदिया : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा व संनियंत्रण समितीच्या सभेत करण्यात आले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजेंद्र जैन, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. सदस्य राजेश चतुर, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा भूजल व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक काझी प्रामुख्याने उपस्थित होते. सादरीकरणातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. मागील पाच वर्षांत ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची निवड या अभियानात करण्यात आली. (प्रतिनिधी)अभियानांतर्गत करण्यात येणारी कामेया अभियानांतर्गत पाणलोट विकास कामे, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्यांची कामे, नाला खोलीकरण-रूंदीकरण, जुन्या जल संरचनांना पुनर्जीवित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे व साठवण बंधाऱ्यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव व लघु तलावांची दुरूस्ती व नुतणीकरण, क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, माती नाला व बांधातील गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापरासाठी उपाय योजना करणे, लहान ओढे-नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर-बोअरवेलचे पुनर्भरण करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, पाणी वापर संस्थांना बळकटीकरण करणे, कालव्यांची दुरूस्ती करणे आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले.