शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

जलयुक्त शिवार अभियानाचे सादरीकरण

By admin | Updated: February 12, 2015 01:22 IST

टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

गोंदिया : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा व संनियंत्रण समितीच्या सभेत करण्यात आले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजेंद्र जैन, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. सदस्य राजेश चतुर, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा भूजल व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक काझी प्रामुख्याने उपस्थित होते. सादरीकरणातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. मागील पाच वर्षांत ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची निवड या अभियानात करण्यात आली. (प्रतिनिधी)अभियानांतर्गत करण्यात येणारी कामेया अभियानांतर्गत पाणलोट विकास कामे, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्यांची कामे, नाला खोलीकरण-रूंदीकरण, जुन्या जल संरचनांना पुनर्जीवित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे व साठवण बंधाऱ्यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव व लघु तलावांची दुरूस्ती व नुतणीकरण, क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, माती नाला व बांधातील गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापरासाठी उपाय योजना करणे, लहान ओढे-नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर-बोअरवेलचे पुनर्भरण करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, पाणी वापर संस्थांना बळकटीकरण करणे, कालव्यांची दुरूस्ती करणे आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले.