शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरत सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गाेरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 वातावरणात वाढला गारवा

- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा वाढल्याने पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर हुडहुडी कायम होती, तर सकाळी स्वेटर आणि सायंकाळी रेनकोट असाच अनुभव जिल्हावासीयांना आला. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अवकाळीचे संकट कायम आहे.

या परिसराला बसला फटका- मंगळवारी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीेट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, बोदलकसा, बुचाटोला, पिंडकेपार, रूस्तमपूर, आलेझरी, बालापूर, मेंढा, ठानेगाव, खडकी, डोंगरगाव, इंदोरा, निमगाव, मेंदीपूर, भिवापूर, गराडा, चिखली, खमारी, मलपुरी आणि गोरेगाव, गोंदिया या तालुक्यांना बसला.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती