शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरत सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गाेरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 वातावरणात वाढला गारवा

- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा वाढल्याने पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर हुडहुडी कायम होती, तर सकाळी स्वेटर आणि सायंकाळी रेनकोट असाच अनुभव जिल्हावासीयांना आला. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अवकाळीचे संकट कायम आहे.

या परिसराला बसला फटका- मंगळवारी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीेट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, बोदलकसा, बुचाटोला, पिंडकेपार, रूस्तमपूर, आलेझरी, बालापूर, मेंढा, ठानेगाव, खडकी, डोंगरगाव, इंदोरा, निमगाव, मेंदीपूर, भिवापूर, गराडा, चिखली, खमारी, मलपुरी आणि गोरेगाव, गोंदिया या तालुक्यांना बसला.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती