शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरत सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गाेरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 वातावरणात वाढला गारवा

- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा वाढल्याने पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर हुडहुडी कायम होती, तर सकाळी स्वेटर आणि सायंकाळी रेनकोट असाच अनुभव जिल्हावासीयांना आला. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अवकाळीचे संकट कायम आहे.

या परिसराला बसला फटका- मंगळवारी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीेट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, बोदलकसा, बुचाटोला, पिंडकेपार, रूस्तमपूर, आलेझरी, बालापूर, मेंढा, ठानेगाव, खडकी, डोंगरगाव, इंदोरा, निमगाव, मेंदीपूर, भिवापूर, गराडा, चिखली, खमारी, मलपुरी आणि गोरेगाव, गोंदिया या तालुक्यांना बसला.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती