शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:20 PM

गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती.

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, पाऊस गाठणार सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून सर्वत्र दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येत्या २४ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले.त्यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाला सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट सुध्दा टळले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला होता.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली.देवरी, तिरोडा, आमगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्यात जवळपास चार ते पावसाने हजेरी लावल्याने या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. काही नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाले होते. अर्जुनी मोरगाव, तिरोडा,सालेकसा,आमगाव आणि देवरी तालुक्यात सुध्दा पावसाची रिपरिप कायम होती.पावसामुळे रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात रेड अर्लटहवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अर्लट जाहीर केला आहे.जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे मंगळवारी सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले होते. शिवाय यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली असून नदीकाठा लगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस