शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:22 IST

गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती.

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, पाऊस गाठणार सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून सर्वत्र दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येत्या २४ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले.त्यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाला सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट सुध्दा टळले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला होता.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली.देवरी, तिरोडा, आमगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्यात जवळपास चार ते पावसाने हजेरी लावल्याने या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. काही नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाले होते. अर्जुनी मोरगाव, तिरोडा,सालेकसा,आमगाव आणि देवरी तालुक्यात सुध्दा पावसाची रिपरिप कायम होती.पावसामुळे रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात रेड अर्लटहवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अर्लट जाहीर केला आहे.जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे मंगळवारी सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले होते. शिवाय यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली असून नदीकाठा लगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस